शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार; विश्वास पाटील यांचा छ. शाहू चरित्र लिहण्याचा मानस

By दीपक देशमुख | Updated: May 28, 2023 11:52 IST

विधात्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्यायच केला आहे. त्यांना अवघे ४९ वर्षांचे आयुष्य लाभले.

सातारा : विधात्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्यायच केला आहे. त्यांना अवघे ४९ वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांना आणखी दहा वर्षे आयुष्य दिले असते तर मराठ्यांची घोडी लंडन आणि पॅरीसच्या सीमांवर छत्रपती शिवरायांनी धडकली असती. अलेक्झांडर आणि नेपोलियन यांच्यापेक्षा महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली, असे उद्गार प्रसिद्ध लेखक 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी काढले. दरम्यान, साताऱ्यात मराठ्यांची राजधानी वसवणाऱ्या छत्रपती शाहूंचे कार्य लाेकांसमोर आणून सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देण्याचा शब्द त्यांनी सातारकरांना दिला.

सातारा येथील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सप्ताहाचा दिमाखात प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. आ. शिवेंद्रराजे भोसले, नगरसेवक अमोल मोहिते, अशोक मोने, धनंजय जांभळे, रेणु येळगावकर यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी, रवी माने, रवींद्र झुटिंग आदी उपस्थित होते.

यावेळी विश्वास पाटील म्हणाले, एखाद्याला तीर्थस्थानाला जायचे असेल तर रायगडाला जा. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जसा समोर आला तसा छत्रपती शिवरायांची चौथी गादी साताऱ्यात ज्या छत्रपती शाहूंनी वसवली त्यांचे कार्य पुढे आलेले नाही.त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांवर कादंबरी लिहणार आहे. थोरले शाहू महाराज एवढे करारी होते की पुण्याचे पेशवे नीट वागेना म्हणून नानासाहेब यांची पेशवाई एक महिन्यासाठी काढून घेतली होती. छत्रपती संभाजी यांच्या पत्नी दुर्गाबाई यांनी ४० वर्षे तर येसूबाई यांनी ३२ वर्षे शत्रुच्या तुरुंगात कंठली आहे.

या दोघांचे निधन कृष्णाच्या काठावर झाले आहे. साताऱ्याचा इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार असल्याचा शब्द विश्वास पाटील यांनी दिला. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारा ही मराठ्यांची चौथी राजधानी ज्यांच्यामुळे झाली त्यांच्या ते छत्रपती शाहू महाराज अत्यंत कुशल प्रशासक होते. त्यांच्या कार्यकाळात मराठ्यांचे साम्राज्य अटकेपर्यंत मराठ्यांचे साम्राज्य गेले. त्यांच्या कार्याला लेखणीतून विश्वास पाटील यांनी योग्य न्याय द्यावा, त्यासाठी लागेल ती मदत करू. असे आवाहन त्यांनी केले.

मर्दानी खेळ

शिवराज्याभिषेक सप्ताहास शुभारंभप्रसंगी युवक व बालमावळयांनी थरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पथकातील मुला-मुलींनी भाला, ढाल तलवार, लाठी काठी, दांडपट्टा तसेच अग्नीच्या खेळाची प्रात्यक्षिके केली. या सर्वांना लेखक विश्वास पाटील यांच्याहस्ते गाैरवण्यात आले.

मुधोळच्या घोरपड्यांचा इतिहासा

मुधोळच्या बाजी घोरपड्यांंना नेस्तनाबुत केल्यचा दाखला देताना त्यांनी छत्रपती शिवरायांनाही भाऊबंदकीचा सामना करावा लागला, असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले. यावर उपस्थितानी दाद दिली. शिवाय आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही हसून दाद दिली.