शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार; विश्वास पाटील यांचा छ. शाहू चरित्र लिहण्याचा मानस

By दीपक देशमुख | Updated: May 28, 2023 11:52 IST

विधात्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्यायच केला आहे. त्यांना अवघे ४९ वर्षांचे आयुष्य लाभले.

सातारा : विधात्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्यायच केला आहे. त्यांना अवघे ४९ वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांना आणखी दहा वर्षे आयुष्य दिले असते तर मराठ्यांची घोडी लंडन आणि पॅरीसच्या सीमांवर छत्रपती शिवरायांनी धडकली असती. अलेक्झांडर आणि नेपोलियन यांच्यापेक्षा महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली, असे उद्गार प्रसिद्ध लेखक 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी काढले. दरम्यान, साताऱ्यात मराठ्यांची राजधानी वसवणाऱ्या छत्रपती शाहूंचे कार्य लाेकांसमोर आणून सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देण्याचा शब्द त्यांनी सातारकरांना दिला.

सातारा येथील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सप्ताहाचा दिमाखात प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. आ. शिवेंद्रराजे भोसले, नगरसेवक अमोल मोहिते, अशोक मोने, धनंजय जांभळे, रेणु येळगावकर यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी, रवी माने, रवींद्र झुटिंग आदी उपस्थित होते.

यावेळी विश्वास पाटील म्हणाले, एखाद्याला तीर्थस्थानाला जायचे असेल तर रायगडाला जा. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जसा समोर आला तसा छत्रपती शिवरायांची चौथी गादी साताऱ्यात ज्या छत्रपती शाहूंनी वसवली त्यांचे कार्य पुढे आलेले नाही.त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांवर कादंबरी लिहणार आहे. थोरले शाहू महाराज एवढे करारी होते की पुण्याचे पेशवे नीट वागेना म्हणून नानासाहेब यांची पेशवाई एक महिन्यासाठी काढून घेतली होती. छत्रपती संभाजी यांच्या पत्नी दुर्गाबाई यांनी ४० वर्षे तर येसूबाई यांनी ३२ वर्षे शत्रुच्या तुरुंगात कंठली आहे.

या दोघांचे निधन कृष्णाच्या काठावर झाले आहे. साताऱ्याचा इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार असल्याचा शब्द विश्वास पाटील यांनी दिला. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारा ही मराठ्यांची चौथी राजधानी ज्यांच्यामुळे झाली त्यांच्या ते छत्रपती शाहू महाराज अत्यंत कुशल प्रशासक होते. त्यांच्या कार्यकाळात मराठ्यांचे साम्राज्य अटकेपर्यंत मराठ्यांचे साम्राज्य गेले. त्यांच्या कार्याला लेखणीतून विश्वास पाटील यांनी योग्य न्याय द्यावा, त्यासाठी लागेल ती मदत करू. असे आवाहन त्यांनी केले.

मर्दानी खेळ

शिवराज्याभिषेक सप्ताहास शुभारंभप्रसंगी युवक व बालमावळयांनी थरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पथकातील मुला-मुलींनी भाला, ढाल तलवार, लाठी काठी, दांडपट्टा तसेच अग्नीच्या खेळाची प्रात्यक्षिके केली. या सर्वांना लेखक विश्वास पाटील यांच्याहस्ते गाैरवण्यात आले.

मुधोळच्या घोरपड्यांचा इतिहासा

मुधोळच्या बाजी घोरपड्यांंना नेस्तनाबुत केल्यचा दाखला देताना त्यांनी छत्रपती शिवरायांनाही भाऊबंदकीचा सामना करावा लागला, असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले. यावर उपस्थितानी दाद दिली. शिवाय आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही हसून दाद दिली.