शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

घोटभर पाण्यासाठी धडपड हाच त्यांचा दोष!

By admin | Updated: April 3, 2016 23:42 IST

महिन्यात सात बळी : मार्च महिन्यात पाण्यासाठी गेलेल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

सातारा : पावसाचा आणि धरणांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात कधीकाळी पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागेल, असे वाटलेही नसेल; पण यंदा मार्चपासूनच सातारकरांवर ही वेळ आली आहे. मार्च महिन्यात पाण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून तर तिघांचा पाण्याच्या शोधात विहिरतीत उतल्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. ‘घोटभर पाण्यासाठी धडपड...’ हा या सहा जणांचा दोष होता. सातारा जिल्ह्यालाही दुष्काळाचे चटके बसायला लागले आहेत. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांसह कमी पाऊस पडलेल्या गावांमधून ‘पाणी द्या...’ असा टाहो फोडला जात आहे. गावागावातून टँकर, विंधन विहिरी, कूपनलिकांची मागणी केली जात असतानाच शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दुष्काळी बैठक घेतली. या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुष्काळग्रस्तांच्या भावना पोटतिडकीने मांडल्या; पण प्रशासकीय अधिकारी ‘कागदी घोडे नाचवत दुष्काळ नाहीच’ असा आव आणत होते. राज्याला पाणी अन् वीज देणाऱ्या पाटण तालुक्यातील असवले येथील तरुणी कमल उत्तम असवले ही वाल्मीकी पठारावर असलेल्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. खंडाळा तालुक्यातील गुठाळे येथे पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेला रवींद्र दीपक चव्हाण (वय २३, सध्या रा. मावळ्याचा दरा गुठाळे, ता. खंडाळा मूळ रा. बोरामणी, ता. जि. सोलापूर) याचा मृत्यू झाला होता. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथेही मंगल रवींद्र घाडगे यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता. या काळात सर्वात दुर्दैवी घटना कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी येथे घडली. पोपट शंकर सावंत यांचा कोरड्या विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाला. पाणी आणण्यासाठी गेल्यामुळे या तरुणांचा मृत्यू असतानाच ग्रामीण भागात पाण्याचा शोध थांबलेला नाही. नवीन विहिरी घेण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विहिरीत गाळ काढून पाण्याचा शोध घेतला जात आहे. पाणी शोधत असतानाही तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी येथे विहिरीतील गाळ काढत असताना अपघात होऊन सजन चंद्रभान पटेल (वय १९) याचा मृत्यू झाला. तर जावळी तालुक्यातील भामघर येथे क्रेन डोक्यात पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द येथे विहिर खोदताना यारी पडल्याने नंदकुमार कदम यांचा रविवार, दि. ३ रोजी मृत्यू झाला. जिल्ह्यात पाणीटंचाई नाही, असे सांगत असलेल्या प्रशासनाला या सहा जणांचे निधन दिसलेच नाही. दिसणारच कसे? कारण घोटभर पाण्यासाठी धडपड केली हाच त्यांचा दोष होता? असा सवाल तमाम जनतेतून होत आहे. (प्रतिनिधी)