शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

घोटभर पाण्यासाठी धडपड हाच त्यांचा दोष!

By admin | Updated: April 3, 2016 23:42 IST

महिन्यात सात बळी : मार्च महिन्यात पाण्यासाठी गेलेल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

सातारा : पावसाचा आणि धरणांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात कधीकाळी पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागेल, असे वाटलेही नसेल; पण यंदा मार्चपासूनच सातारकरांवर ही वेळ आली आहे. मार्च महिन्यात पाण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून तर तिघांचा पाण्याच्या शोधात विहिरतीत उतल्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. ‘घोटभर पाण्यासाठी धडपड...’ हा या सहा जणांचा दोष होता. सातारा जिल्ह्यालाही दुष्काळाचे चटके बसायला लागले आहेत. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांसह कमी पाऊस पडलेल्या गावांमधून ‘पाणी द्या...’ असा टाहो फोडला जात आहे. गावागावातून टँकर, विंधन विहिरी, कूपनलिकांची मागणी केली जात असतानाच शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दुष्काळी बैठक घेतली. या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुष्काळग्रस्तांच्या भावना पोटतिडकीने मांडल्या; पण प्रशासकीय अधिकारी ‘कागदी घोडे नाचवत दुष्काळ नाहीच’ असा आव आणत होते. राज्याला पाणी अन् वीज देणाऱ्या पाटण तालुक्यातील असवले येथील तरुणी कमल उत्तम असवले ही वाल्मीकी पठारावर असलेल्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. खंडाळा तालुक्यातील गुठाळे येथे पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेला रवींद्र दीपक चव्हाण (वय २३, सध्या रा. मावळ्याचा दरा गुठाळे, ता. खंडाळा मूळ रा. बोरामणी, ता. जि. सोलापूर) याचा मृत्यू झाला होता. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथेही मंगल रवींद्र घाडगे यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता. या काळात सर्वात दुर्दैवी घटना कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी येथे घडली. पोपट शंकर सावंत यांचा कोरड्या विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाला. पाणी आणण्यासाठी गेल्यामुळे या तरुणांचा मृत्यू असतानाच ग्रामीण भागात पाण्याचा शोध थांबलेला नाही. नवीन विहिरी घेण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विहिरीत गाळ काढून पाण्याचा शोध घेतला जात आहे. पाणी शोधत असतानाही तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी येथे विहिरीतील गाळ काढत असताना अपघात होऊन सजन चंद्रभान पटेल (वय १९) याचा मृत्यू झाला. तर जावळी तालुक्यातील भामघर येथे क्रेन डोक्यात पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द येथे विहिर खोदताना यारी पडल्याने नंदकुमार कदम यांचा रविवार, दि. ३ रोजी मृत्यू झाला. जिल्ह्यात पाणीटंचाई नाही, असे सांगत असलेल्या प्रशासनाला या सहा जणांचे निधन दिसलेच नाही. दिसणारच कसे? कारण घोटभर पाण्यासाठी धडपड केली हाच त्यांचा दोष होता? असा सवाल तमाम जनतेतून होत आहे. (प्रतिनिधी)