शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कोरोना चाचणीच्या अहवालासाठी लागताहेत पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

वाठार स्टेशन : राज्यभरात थैमान घातलेल्या कोरोनाने सध्या ग्रामीण भागातील जनताही मोठ्या संकटात सापडली आहे. दररोजची कोरोनाची वाढती आकडेवारी ...

वाठार स्टेशन : राज्यभरात थैमान घातलेल्या कोरोनाने सध्या ग्रामीण भागातील जनताही मोठ्या संकटात सापडली आहे. दररोजची कोरोनाची वाढती आकडेवारी रोखण्यासाठी शासन, आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी कोरोना चाचणीचे अहवाल मिळण्यासाठी मात्र तब्बल पाच ते सहा दिवस विलंब होत असल्याने उपचारासाठी कोरोना रुग्णाला हाल सोसावे लागत आहेत.

सध्या कोरोनाचा फास शहराबरोबरच ग्रामीण भागातही घट्ट झाला आहे. दररोजची वाढती कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. तरीही रुग्ण संख्या मात्र कुठेही कमी होताना दिसत नसल्याने कोरोना रुग्ण संपर्कात आलेल्या लोकांच्या जास्तीत जास्त आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र, शासनस्तरावर या चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी किमान पाच दिवसांचा वेळ जात आहे.

या कालावधीत जर रुग्ण कोरोना बाधित नसेल तरी त्याला घरी बसण्याची वेळ येत आहे. तर बाधित असेल तर तोपर्यंत तो कितीजणांच्या संपर्कात येईल याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे अहवाल तातडीने मिळण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे.

शासनाने कोरोना या महाभयानक आजाराबाबतीत योग्य धोरण राबवित कोरोना हद्दपार करण्यासाठी योग्य उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र, दुसरीकडे नियोजनात थोडीफार ढिलाई होत असल्याने रुग्णांना याचा फटका बसत आहे.