शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

महात्मा गांधींचे विचार अंगिकारणे गरजेचे : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST

कऱ्हाड : महात्मा गांधींनी देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर समाज आणि व्यवस्थेशी संबंधित विचार मांडले. त्यांच्या या ...

कऱ्हाड : महात्मा गांधींनी देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर समाज आणि व्यवस्थेशी संबंधित विचार मांडले. त्यांच्या या विचारांना आपण अंगिकारणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

येथील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, मलकापूर शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र यादव, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष झाकीर पठाण, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव थोरात यांच्यासह मलकापूरचे नगरसेवक उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गांधीजींची सत्य, अहिंसा, सत्याग्रह अशी अनेक तत्व आजच्या काळात समर्पक आहेत. गांधीवादाने जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यवादी सत्तेला उखडून फेकले गेले. यापासून अनेक दुर्बल देशांनी प्रेरणा घेत स्वातंत्र्य मिळवले. गांधींच्या विचारांना आजही जगात ऐकले जाते. सत्तर वर्षांपूर्वी त्यांचा जीव घेतला गेला; पण त्यांच्या तत्वांना ज्याला आपण गांधींवाद म्हणतो त्याला कोणीही मारू शकत नाही. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : ०१केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिवादन केले.