शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महात्मा गांधींचे विचार अंगिकारणे गरजेचे : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST

कऱ्हाड : महात्मा गांधींनी देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर समाज आणि व्यवस्थेशी संबंधित विचार मांडले. त्यांच्या या ...

कऱ्हाड : महात्मा गांधींनी देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर समाज आणि व्यवस्थेशी संबंधित विचार मांडले. त्यांच्या या विचारांना आपण अंगिकारणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

येथील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, मलकापूर शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र यादव, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष झाकीर पठाण, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव थोरात यांच्यासह मलकापूरचे नगरसेवक उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गांधीजींची सत्य, अहिंसा, सत्याग्रह अशी अनेक तत्व आजच्या काळात समर्पक आहेत. गांधीवादाने जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यवादी सत्तेला उखडून फेकले गेले. यापासून अनेक दुर्बल देशांनी प्रेरणा घेत स्वातंत्र्य मिळवले. गांधींच्या विचारांना आजही जगात ऐकले जाते. सत्तर वर्षांपूर्वी त्यांचा जीव घेतला गेला; पण त्यांच्या तत्वांना ज्याला आपण गांधींवाद म्हणतो त्याला कोणीही मारू शकत नाही. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : ०१केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिवादन केले.