शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी खरं बोलणं जास्त महत्त्वाचं: वर्षा देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:57 IST

सातारा : ‘मकर संक्रांतीचा सण म्हटलं की तिळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही ...

सातारा : ‘मकर संक्रांतीचा सण म्हटलं की तिळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं आहे. अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी खरं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे बरं पेक्षा खरं बोलणं आणि त्यातून समाजात क्रांती निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व घडवणं महत्त्वाचं आहे,’ असे मत लेक लाडकी अभियानाच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केले.सण, समारंभ पारंपरिक पद्धतीने साजरे न होता त्याला आधुनिकतेचीही जोड मिळणं आवश्यक आहे. रोजच्या जीवनाशी, व्यवहाराशी त्याचं सांगड घालणं गरजेचं आहे. राग येणं ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण चुकीच्या गोष्टीचा राग येणं आवश्यक आहे; पण राग व्यक्त करण्याची पद्धत सकारात्मक असली पाहिजे. राग आल्यामुळे आणि चुकीच्या गोष्टींच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सामाजिक आंदोलने आणि चळवळी उभ्या राहत असतात; पण त्यातून हिंसा होणं गैरच आहे. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या त्या व्यक्तींविषयी राग न धरता त्याला ती चूक का करावी वाटली, याचा विचार करून त्या बाबीविषयी राग येणं गरजेचं आहे. महात्मा गांधी याबाबत आमचे आदर्श आहेत. त्यांना चुकीच्या गोष्टींची प्रचंड चीड होती; पण त्यांनी कायम प्रेमाने, संयमाने आणि माणुसकीला साद घालून एखाद्यातील दुष्प्रवृत्तीला बाहेर काढलं. ती नाहीशी केली जाईल, याच पद्धतीने त्यांनी धरणे आंदोलन, उपोषणे आदी केली. अंहिसेच्या मार्गाने जाताना कायम गोड बोलणं हे एक मोठं शस्त्र ठरू शकतं. त्यामुळे गुड बोला किंवा गोड बोला, हे म्हणणं पुरेसं नाही, तसं पाहता बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं महत्त्वाचं आहे. गोड बोलण्यापेक्षा कधीतरी कडवट बोललं तरी चालेल; पण समोरच्याचं हित होईल, अशा पद्धतीने आपण बोलणं गरजेचं आहे.राज्यात महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार याला आळा घालण्यासाठी समाज म्हणून सर्वांनी संघटित होणं आणि महिला अधिकारासाठी एकत्रित लढा उभं करणंही महत्त्वाचं आहे. बालविवाह रोखून आपण काही आयुष्य घडवू शकलो तर सणाचं निमित्त सार्थकी लागेल. सत्याच्या मार्गाने जाण्यासाठी, सत्याचा आग्रह धरत लढाऊपणे चीड आणणारी माणसंच हा समाज बदलू शकतील, अशी माझी धारणा आहे. आपण आपल्याला केवळ गोड बोलण्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण चांगलं काम करुया, परस्परांशी गोड बोलता येईल, असं शांत, सुंदर, अहिंसक वातावरण महाराष्ट्रात निर्माण करूया, असं मला वाटतं.