शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी खरं बोलणं जास्त महत्त्वाचं: वर्षा देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:57 IST

सातारा : ‘मकर संक्रांतीचा सण म्हटलं की तिळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही ...

सातारा : ‘मकर संक्रांतीचा सण म्हटलं की तिळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं आहे. अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी खरं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे बरं पेक्षा खरं बोलणं आणि त्यातून समाजात क्रांती निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व घडवणं महत्त्वाचं आहे,’ असे मत लेक लाडकी अभियानाच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केले.सण, समारंभ पारंपरिक पद्धतीने साजरे न होता त्याला आधुनिकतेचीही जोड मिळणं आवश्यक आहे. रोजच्या जीवनाशी, व्यवहाराशी त्याचं सांगड घालणं गरजेचं आहे. राग येणं ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण चुकीच्या गोष्टीचा राग येणं आवश्यक आहे; पण राग व्यक्त करण्याची पद्धत सकारात्मक असली पाहिजे. राग आल्यामुळे आणि चुकीच्या गोष्टींच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सामाजिक आंदोलने आणि चळवळी उभ्या राहत असतात; पण त्यातून हिंसा होणं गैरच आहे. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या त्या व्यक्तींविषयी राग न धरता त्याला ती चूक का करावी वाटली, याचा विचार करून त्या बाबीविषयी राग येणं गरजेचं आहे. महात्मा गांधी याबाबत आमचे आदर्श आहेत. त्यांना चुकीच्या गोष्टींची प्रचंड चीड होती; पण त्यांनी कायम प्रेमाने, संयमाने आणि माणुसकीला साद घालून एखाद्यातील दुष्प्रवृत्तीला बाहेर काढलं. ती नाहीशी केली जाईल, याच पद्धतीने त्यांनी धरणे आंदोलन, उपोषणे आदी केली. अंहिसेच्या मार्गाने जाताना कायम गोड बोलणं हे एक मोठं शस्त्र ठरू शकतं. त्यामुळे गुड बोला किंवा गोड बोला, हे म्हणणं पुरेसं नाही, तसं पाहता बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं महत्त्वाचं आहे. गोड बोलण्यापेक्षा कधीतरी कडवट बोललं तरी चालेल; पण समोरच्याचं हित होईल, अशा पद्धतीने आपण बोलणं गरजेचं आहे.राज्यात महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार याला आळा घालण्यासाठी समाज म्हणून सर्वांनी संघटित होणं आणि महिला अधिकारासाठी एकत्रित लढा उभं करणंही महत्त्वाचं आहे. बालविवाह रोखून आपण काही आयुष्य घडवू शकलो तर सणाचं निमित्त सार्थकी लागेल. सत्याच्या मार्गाने जाण्यासाठी, सत्याचा आग्रह धरत लढाऊपणे चीड आणणारी माणसंच हा समाज बदलू शकतील, अशी माझी धारणा आहे. आपण आपल्याला केवळ गोड बोलण्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण चांगलं काम करुया, परस्परांशी गोड बोलता येईल, असं शांत, सुंदर, अहिंसक वातावरण महाराष्ट्रात निर्माण करूया, असं मला वाटतं.