विंग (ता. कऱ्हाड) येथील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करताना ते बोलत होते. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी पर्यवेक्षक डी. जे. निकम, एस. एस. यादव, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक यू. एस. गलांडे, एस. व्ही. जाधव, एस. एन. जाधव उपस्थित होते.
मुख्याध्यापक व्ही. बी. मोरे म्हणाले, आनंदी जीवनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून त्याचसाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. सध्या भूस्खलनासह अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. या आपत्ती रोखण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. वृक्ष हे निसर्ग समतोलाचा अविभाज्य घटक आहेत. त्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.
यावेळी बी. बी. कुंभार, एन. आर. पाटील, व्ही. व्ही. देवकर, डी. टी. यमगेकर, सी. जी. मगदूम, एस. एस. खेतमर, यु. जे. बिचुकले, डी. जे. बामणे, एम. व्ही. रणसिंग, प्रशांत जगताप, चंद्रकांत पाटील, रवींद्र कांदेकर उपस्थित होते.
फोटो : २४केआरडी०१
कॅप्शन : विंग (ता. कऱ्हाड) येथील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात मुख्याध्यापक व्ही. बी. मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.