शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

पर्यटन स्थळावरील मुक्तसंचार देतोय कोरोनाला निमंत्रण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:36 IST

वेळे : सगळीकडे कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. जवळपास सर्वच व्यवहार, बाजारपेठा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू आहेत. यामध्ये अनेक ...

वेळे : सगळीकडे कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. जवळपास सर्वच व्यवहार, बाजारपेठा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू आहेत. यामध्ये अनेक ठिकाणचे लोक परस्परांच्या नकळत संपर्कात येत असतात. पर्यटनस्थळी पर्यटकांचा वावर वाढत आहे. काही लोक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. मात्र ग्रामस्थांचा मुक्तसंचार कोरोनाला नियंत्रण देत आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणचे लोक कोणत्याही निमित्ताने इतरत्र प्रवास करीत आहेत. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, त्या ठिकाणाहून अनेक लोक जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटनाच्या निमित्ताने येत आहेत. त्यांना फक्त सुटीची मजा अनुभवायची असते. मात्र हेच लोक जर आधीपासून बाधित असतील आणि त्यांना याची कल्पनाही नसेल, तर हेच लोक आपल्या परिसरात येऊन आपल्या संपर्कात येऊन आपल्याला याची बाधा कधी पोहोचवतील हे सांगता येत नाही. लोक मुक्तसंचार करत असताना त्यांच्या नाकावर व तोंडावर मास्क परिधान करायची सवय खूप कमी लोकांना असते. यावरून एक अंदाज येतो की, किती लोक आपल्या तोंडावर व नाकावर व्यवस्थितपणे मास्क परिधान करतात.

मास्क नसलेल्या व्यक्तींवर अगदी काटेकोरपणे अंमलबजावणी होताना कुठेही दिसत नाही. वाई, पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी नेहमीच पर्यटक येत असतात. यापैकी अनेकांच्या तोंडावर मास्क दिसत नाही. या ठिकाणच्या व्यावसायिकांनाही या मास्कचे वावडे असल्यासारखे दिसते. मुंबई, पुणे यासारख्या कोरोना हॉट स्पॉटच्या ठिकाणाहून प्रत्येक सुटीच्या दिवशी लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. हेच लोक कोरोना पसरविण्यात कारणीभूत ठरू शकतात. लोकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर जाण्याचे टाळावे, मास्क परिधान करावा, हात स्वच्छ धुवावेत, गर्दी टाळावी यासाठी शासनाने नियमावली केली आहे, तरीही लोक या नियमावलीला केराची टोपली दाखवून आपत्ती ओढवून घेत आहेत. अशा या समाजकंटकांना धडा शिकवलाच पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

आजही अनेक लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्ये मोठ्या दिमाखात होत आहेत. यामध्ये शंभराहून अधिक लोक एकत्रित येतात. अनेक ठिकाणाहून ही मंडळी आलेली असतात. यावेळी कोणीही त्यांची तपासणी करून त्यांना सामावून घेताना दिसत नाही. हे फक्त आणि फक्त कागदावरच राहते. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव कधी कोणत्या ठिकाणी होईल याचा अंदाज लागत नाही. मुंबई, पुणे यासारख्या विविध ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील लोक वास्तव्य करीत आहेत.