शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

पर्यटन स्थळावरील मुक्तसंचार देतोय कोरोनाला निमंत्रण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:36 IST

वेळे : सगळीकडे कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. जवळपास सर्वच व्यवहार, बाजारपेठा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू आहेत. यामध्ये अनेक ...

वेळे : सगळीकडे कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. जवळपास सर्वच व्यवहार, बाजारपेठा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू आहेत. यामध्ये अनेक ठिकाणचे लोक परस्परांच्या नकळत संपर्कात येत असतात. पर्यटनस्थळी पर्यटकांचा वावर वाढत आहे. काही लोक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. मात्र ग्रामस्थांचा मुक्तसंचार कोरोनाला नियंत्रण देत आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणचे लोक कोणत्याही निमित्ताने इतरत्र प्रवास करीत आहेत. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, त्या ठिकाणाहून अनेक लोक जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटनाच्या निमित्ताने येत आहेत. त्यांना फक्त सुटीची मजा अनुभवायची असते. मात्र हेच लोक जर आधीपासून बाधित असतील आणि त्यांना याची कल्पनाही नसेल, तर हेच लोक आपल्या परिसरात येऊन आपल्या संपर्कात येऊन आपल्याला याची बाधा कधी पोहोचवतील हे सांगता येत नाही. लोक मुक्तसंचार करत असताना त्यांच्या नाकावर व तोंडावर मास्क परिधान करायची सवय खूप कमी लोकांना असते. यावरून एक अंदाज येतो की, किती लोक आपल्या तोंडावर व नाकावर व्यवस्थितपणे मास्क परिधान करतात.

मास्क नसलेल्या व्यक्तींवर अगदी काटेकोरपणे अंमलबजावणी होताना कुठेही दिसत नाही. वाई, पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी नेहमीच पर्यटक येत असतात. यापैकी अनेकांच्या तोंडावर मास्क दिसत नाही. या ठिकाणच्या व्यावसायिकांनाही या मास्कचे वावडे असल्यासारखे दिसते. मुंबई, पुणे यासारख्या कोरोना हॉट स्पॉटच्या ठिकाणाहून प्रत्येक सुटीच्या दिवशी लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. हेच लोक कोरोना पसरविण्यात कारणीभूत ठरू शकतात. लोकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर जाण्याचे टाळावे, मास्क परिधान करावा, हात स्वच्छ धुवावेत, गर्दी टाळावी यासाठी शासनाने नियमावली केली आहे, तरीही लोक या नियमावलीला केराची टोपली दाखवून आपत्ती ओढवून घेत आहेत. अशा या समाजकंटकांना धडा शिकवलाच पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

आजही अनेक लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्ये मोठ्या दिमाखात होत आहेत. यामध्ये शंभराहून अधिक लोक एकत्रित येतात. अनेक ठिकाणाहून ही मंडळी आलेली असतात. यावेळी कोणीही त्यांची तपासणी करून त्यांना सामावून घेताना दिसत नाही. हे फक्त आणि फक्त कागदावरच राहते. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव कधी कोणत्या ठिकाणी होईल याचा अंदाज लागत नाही. मुंबई, पुणे यासारख्या विविध ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील लोक वास्तव्य करीत आहेत.