शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:19 IST

सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारकरांच्या जिव्हाळ्याचे तीन प्रकल्प प्रगतिपथावर असून, या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कास ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारकरांच्या जिव्हाळ्याचे तीन प्रकल्प प्रगतिपथावर असून, या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कास धरणाचे काम जवळपास ७५ टक्के तर ग्रेड सेपरेटरेचे काम ७० टक्के पूर्णत्वास आले आहे. केवळ पालिकेची भुयारी गटार योजना संथ गतीने सुरू असून, हे काम गतिमान करणे गरजेचे बनले आहे.आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाका परिसरातून दररोज सुमारे २ लाख ७१ हजार ४५० वाहने ये-जा करतात. शहरातील सर्वाधिक वाहतुकीचा ताण याच ठिकाणी पाहावयास मिळतो. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर (भुयारी मार्ग) उभारण्याचे काम बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.याचबरोबरच वाढती लोकसंख्या व शहरीकरणाचा विचार करता नगरपालिकेच्या वतीने कास धरणाची उंची वाढविण्याचे कामही हाती घेण्यात आले. १ मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत धरणाचे एकूण काम ७५ टक्के तर मातीकाम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामेही प्रगतीपथावर आहते.ग्रेड सेपरेटर व कास धरणाच्या उंचीसह शहरात यावर्षी भुयारी गटार योजनेचे कामही सातारा नगर पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या योजनेचे गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये केवळ १५ टक्के काम पूर्णत्वास आले आहे. पावसाळ्यात कास धरण व भुयारी गटार योजनेचे काम पूर्णपणे बंद राहणारआहे. पावसाळा संपल्यानंतर ही कामे पुन्हा हाती घेतली जाणार आहेत. ग्रेड सेपरेटरचे काम मात्र पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. डिसेंबर २०१९पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनोदय आहे.७५ कोटींची योजनापुणे-मुंबईच्या धरतीवर ग्रेड सेपरेटरची बांधणी होत असून, जिल्ह्यातील ही पहिलीच योजना आहे. सुमारे ६० कोटी रुपयांचे हे काम होते. मात्र, त्यानंतर गोडोलीकडे जाणाºया मार्गाचे अधिक काम करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण ग्रेड सेपरेटरचे काम हे ७५ कोटींवर गेले आहे. चौदा महिन्यांत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.पहिल्या टप्प्यात५० कोटींची तरतूदशहरातील चिमणपुरा पेठ, व्यंकटपुरा पेठ, करंजे, बुधवार नाका परिसर, बोकील बोळ आदी ठिकाणी भुयारी गटारचे काम करण्यात आले आहे. शहरात एकूण ३२ किलोमीटर क्षेत्रात भुयारी गटारचे काम केले जाणार आहे. आतापर्यंत दोन किलोमीटर क्षेत्रातील काम पूर्ण झाले आहे. शासनाकडून या योजनेच्या पूर्णत्वासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे.