शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचा देशात डंका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : सदृढ बालक असेल तर देश बलशाली बनेल, हे ध्येय घेऊन राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खंडाळा : सदृढ बालक असेल तर देश बलशाली बनेल, हे ध्येय घेऊन राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत महाराष्ट्राची भावी पिढी सदृढ, निरोगी व बुद्धिवान होण्यासाठी आणि राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. खंडाळा तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाने गावोगावी विविध उपक्रम राबविले. या अभिनव उपक्रमांची नोंद देशपातळीवर घेण्यात आली असून, या अभियानात खंडाळा तालुका देशात अव्वल ठरला आहे.

भारताची भावी पिढी सक्षम तयार व्हावी, यासाठी पोषण अभियानाची उद्दिष्टे निश्चित करून ते गावपातळीवर राबविण्यात आले. यामध्ये सहा वर्षे वयोगटाखालील बालकांमधील बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, सहा महिने ते पाच वर्षे वयोगटांतील बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे, १५ वर्षांवरील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे यांचा समावेश करण्यात आला होता.

या अनुषंगाने तालुक्यातील ६५ गावांमध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले गेले. यासाठी बालकांचे पहिले १०० दिवस वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. याशिवाय ॲनेमिया, अतिसार कमी करण्यावर भर देऊन हात धुणे व वैयक्तिक स्वच्छता, वैविध्यपूर्ण पौष्टिक आहार याला प्राधान्यक्रम देण्यात आले होते. ही योजना राबविण्यासाठी पोषण अभियानांतर्गत ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता, नगरविकास, अन्न व औषध प्रशासन, पोषण आहार बोर्ड व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या विभागांचा समन्वय करण्यात आला असून, महिला व बालविकास विभाग नोडल विभाग म्हणून कामकाज करीत आहे.

(चौकट)

पोषण अभियानाची आवश्यकता....

लोकांना पहिल्या दोन वर्षांतील बालकांच्या आहाराचे महत्त्व अद्यापही कळलेले नाही. यामुळे काही भागांत कुपोषणाची समस्या अजूनही कायम आहे. अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून

कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न केले जात आहेत. बाल्यावस्था हा मानवाच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. गरोदरपणामध्ये महिलांना व जन्मानंतर बालकांस पहिल्या दोन वर्षांत योग्य आहार न मिळाल्यास त्याचे दूरगामी परिणाम हे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर होत असतात. लहान वयात कुपोषणामुळे कमी प्रतिकारशक्ती, कमी बुद्ध्यांक, कमी शैक्षणिक प्रगती, कमी शारीरिक वाढ, संवाद कौशल्याची कमतरता असे विपरित परिणाम होऊ शकतात.

(कोट)

पोषण अभियानांतर्गत पोषणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अंगणवाडी स्तरावर दरमहा समुदाय आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये गरोदर महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून मार्गदर्शन करणे, अन्नप्राशन दिवस, सुपोषण दिवस, पूर्व शालेय शिक्षणासाठी प्रवेश करणाऱ्या बालकांचा प्रवेशोत्सव, सार्वजनिक आरोग्य काळजी घेणे असे उपक्रम राबविले जातात. यामध्ये अंगणवाडी सेविकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच खंडाळा तालुका देशात प्रथम कमांकावर आहे.

-एम. ए. भोईटे, बालविकास प्रकल्प अधिकारी

२६खंडाळा

फोटो आहे..