शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खटाव तालुक्यात कृषी विभागाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:14 IST

खटाव : तालुक्यात घेवडा, सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’मध्ये ‘खटाव ...

खटाव : तालुक्यात घेवडा, सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’मध्ये ‘खटाव तालुक्यात घेवडा, सोयाबीन पिकावर गोगलगाईचा हल्ला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच कृषी विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित शिवाराची पाहणी केली.

सध्या सर्वत्र खरिपाची पिके समाधानकारक उगवून आल्यामुळे शेतकरी सुखावला असतानाच उगवून आलेल्या कोवळ्या अंकुर तसेच असलेली पाने खाल्ल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले; परंतु नक्की कशामुळे झाले हे कळत नसल्यामुळे खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव असेल असे अनेक शेतकऱ्यांना वाटले. परंतु खटावमधील ‘चिंचेची बाग’नामक शिवारात असलेल्या शेतातील २५ ते ३० टक्के पेरणी केलेले शेतातील पीक कुरतडून खाल्ल्याचे लक्षात येताच पाहणी करता, या पिकावर गोगलगाईचे आक्रमण झाल्याचे राजेंद्र भोसले यांच्या निदर्शनास आले. गोगलगाईमुळे पिकाचे नुकसान हे पहिल्यादाच दुष्काळी पट्ट्यात झाल्यामुळे कृषी विभागही अचंबित झाला असून, कृषी अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती खरी आहे का? याची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. गोगलगाईचे आक्रमणामुळे पिकांचे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसणार आहेच. पीक उगवून येतानाच ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. अजून यावर उपाय निघाला नसला एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी कृषी विद्यापीठामधील शास्त्रज्ञांनाचा सल्ला घेऊन निर्णय घेतला जाईल, असे कृषी सहाय्यक एच. बी. भोसले यांनी सांगितले.

०१खटाव

खटाव तालुक्यात गोगलगाईमुळे नुकसान झालेल्या शेताची पाहणी करताना कृषी अधिकारी एच. बी. भोसले. समवेत शेतकरी योगेश माने, राजेंद्र भोसले, वैभव मोरे आदी.