शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्की गुंडांना वेसन घाला

By admin | Updated: March 19, 2015 00:00 IST

शंभूराज देसाई : विधानसभा अधिवेशनात मागणी

पाटण : ‘तालुक्याच्या सह्याद्रीच्या पठारावर मोठ्या प्रमाणात पवनचक्की प्रकल्प उभारण्यात येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांना वेठीस धरून पवनचक्की प्रकल्प बेकायदेशीरपणे उभा राहत आहे. संबंधित कंपन्या शेतकऱ्यांना दमदाटी व मारहाण करण्यासाठी भाडोत्री गुंडांचा वापर करत आहेत. गुंड अनधिकृतपणे स्वत:जवळ शस्त्र बाळगून शेतकऱ्यांना धमकावत आहेत. परंतु पोलीस शांत आहेत. पोलीस यंत्रणा पवनचक्की कंपन्यांची बाजू घेत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुंडांना वेसन घाला,’ अशी मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.गृह विभागाच्या विषयादरम्यान आमदार देसाई यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान मागणी केली. देसाई म्हणाले, ‘पवनचक्की कंपन्यांनी पाटण तालुक्याचा बिहार केला आहे. तालुक्यात तथाकथित गुंड शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांना धमकावणे, दमदाटी करणे व जीवे मारण्याची धमकी देत आहेत; परंतु पोलीस शांत आहेत. एखाद्या शेतकऱ्याची तक्रार पोलिसांकडे करायची म्हटले तर पोलीस यंत्रणा पवनचक्की कंपन्यांची बाजू धरून शेतकऱ्यांना दोषी ठरवत आहेत. भाडोत्री गुंडांकडे अनधिकृत शस्त्रे सापडली आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे अशा गुंडांवर तडीपारीची कारवाई झाली पाहिजे. मात्र जुजबी कारवाई केली जाते. तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्मा कदम यांनी पवनचक्की कंपन्यांची बाजू धरून शेतकऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले.’दरम्यान, ‘गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी गृह विभागावरील मागण्यांना उत्तर देताना पाटण तालुक्यातील पवनचक्की प्रकल्पातून गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले जातील,’ असे आश्वासन दिल्याचे आमदार देसाई यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)धरणाची सुरक्षा अजूनही रामभरोसेच!‘तालुक्यात कोयना धरण असून, धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न रामभरोसे आहे. अनेकदा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करूनही शासनाने तेवढे गांभीर्याने घेतले नाही. पाटण उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक लवकरात लवकर करावी. कोल्हापूर विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे अध्यासन करण्यास मंजुरी मिळाली; मात्र निधी दिलेला नाही,’ असे आ. शंभूराज देसाई म्हणाले.