शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

काळाचा घाला; पण माणुसकीचा ओलावा !

By admin | Updated: May 29, 2015 23:48 IST

नांदलापूरच्या अपघातात मदतीचा ओघ : कुणी दवाखान्यात तर कुणी निघालेलं लग्नाला; सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी सचिवाचा अंत

मलकापूर : सकाळी उठलं की प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात एका नवीन स्वप्नाने होते. अशाच नियोजनानुसार विविध कामांसाठी शुक्रवारी वडापमधून कऱ्हाडकडे निघालेल्या प्रवाशांवर काळाने झडप घातली. दोन बसमधील चालकांच्या वेगाच्या स्पर्धेमुळे ही दुर्घटना घडली. अ‍ॅपे रिक्षात बसलेल्या चार प्रवाशांना जीव गमवावा लागला तर आठजण गंभीर जखमी झाले. काळाचा घाला पडला पण आजुबाजूच्या लोकांनी माणुसकीचा ओलावा दाखवत तत्काळ मदत केली.नेहमी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची प्रवासी खेचून आणण्याची स्पर्धाच सुरू असते. लवकर उठून इतरांपेक्षा एक ट्रिप जास्त मारण्यासाठी सर्वच वडाप चालकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार शुक्रवारी बेलवडे येथील मोहन मोहिते यानेही चांदोली मार्गावर आपला व्यवसाय सुरू केला. येळगाव येथून येळगावसह गोटेवाडी, भुरभूशी, घोगाव अशा विविध थांब्यांवरून त्याने आपल्या रिक्षात प्रवासी घेतले. गोटेवाडीचे काटेकर कुटुंबीय शामगाव येथे मुलीला घेवून पुढे गिरजावडे येथे लग्न समारंभासाठी जाणार होते. भुरभूूशी येथील पाटील कुटूंबीय १२ दिवसांच्या चिमुकलीसह तिच्या आईला दवाखान्यात दाखविण्यासाठी निघाले होते. तर सर्जेराव पाटील हे वारूंजी येथे आपल्याच सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभाच्या तयारीसाठी निघाले होते. या कुटुंबियांसह इतर प्रवासी आपापल्या कामानिमित्त संबंधित रिक्षातून कऱ्हाडला निघाले होते. तर काही प्रवासी मुंबईला जाण्यासाठी कऱ्हाडला निघाले होते. आपला अपघात होईल, याची कसलीच कल्पना घरातून निघताना कोणाच्याही डोक्यात नव्हती. मात्र, अचानक महामार्गावर वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या दोन आरामबसपैकी एका बसने अ‍ॅपे रिक्षाला धडक दिली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या अपघातात एका महिलेसह तिघांना आपला जीव गमवावा लागला. बाळ व पत्नीला घेवून दवाखान्यात जाणाऱ्या बाबुराव पाटील यांनाही जिव गमवावा लागला. तर नोकरीच्या ठिकाणी निरोप समारंभाच्या तयारीसाठी निघालेल्या सर्जेराव पाटील यांना आपल्या आयुष्याचाच निरोप घ्यावा लागला. नातेवाईकांकडे निघालेल्या आनंदीबाईही अपघातात ठार झाल्या. या अपघातात तिन्ही कुटूंबांवर काळाने घाला घातल्याने येळगाव, गोटेवाडी व भुरभूशी गावांवर शोककळा पसरली आहे.(प्रतिनिधी) जखमी महामार्गावर फेकले नांदलापूर येथील अपघातात बसची अ‍ॅपेरिक्षाला एवढी जोरदार धडक बसली की, चालक वगळता रिक्षातील बारा दिवसांच्या बाळासह सर्व प्रवासी महामार्गावर फेकले गेले. घटनास्थळी आरडा ओरडा आणि वाचवा-वाचवा असा एकचं गोंधळ उडाला. बारा दिवसांचे बाळ मातेच्या कुशीत अपघातात दवाखान्यात निघालेल्या पाटील कुटुंबावर काळाने घाला घातला. बाबुराव पाटील रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले तर स्वाती या आपल्या बारा दिवसांच्या बाळाला कुशीत घेवून बेशुध्द अवस्थेत होत्या त्या बाळाला महिलांनी कुशीतून काढून तातडीने दवाखान्यात नेले. ५अज्ञात पोलिसाची सतर्कता अपघात घडला त्यावेळी नेमका स्वत:च्या चारचाकी वाहनातून कोल्हापूरकडे जात असलेल्या (नाव समजले नाही) एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत गाडीतील नातेवाईकांसह स्वत:ही मदत कार्य केले. कोणीही जखमींना उचलण्यासाठी पुढे येत नसताना त्याने स्वत:चे कपडे रक्ताने भरले. तरी त्याची फिकीर केली नाही.