शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

औद्योगिक वसाहतीला नवसंजीवनी देणार

By admin | Updated: July 28, 2015 22:06 IST

सुभाष देसाई : सातारा येथील बैठकीत उद्योजकांच्या समस्यांवर चर्चा

सातारा : ‘सातारा शहर परिसरातील औद्योगिक वसाहतीला गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विविध योजना लवकरच राबवण्यात येणार आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार साताऱ्यात एमआयडीसीचे विभागीय कार्यालय, फायर स्टेशन, नवीन औद्योगिक वसाहतीला चालना देणे, आयटी कंपन्यांची उभारणीबाबत निर्णय घेण्यात येईल,’ अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.सातारा येथे औद्योगिक वसाहतीच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. बैठकीस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, आ. मकरंद पाटील, एमआयडीसीचे मुख्य व्यवस्थापक भूषण गगराणी, क्रीडाईचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष कमलेश पिसाळ, ‘मास’चे अध्यक्ष दिलीप उत्तूर, उपाध्यक्ष जयंत महाजन, कैलास भट, अलंकार जाधव, पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याला मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. मात्र, याठिकाणी विभागीय कार्यालय नाही. तसेच एमआयडीसीसाठी फायर स्टेशन नाही. यामुळे उद्योगांपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यात वाढत्या गुंडगिरी आणि खंडणीच्या प्रकारांमुळे मोठमोठे उद्योगधंदे अडचणीत येत आहेत. गुंडगिरीपासून सातारा एमआयडीसीला सुरक्षित करावे. विभागीय कार्यालय आणि फायर स्टेशनची तातडीने उभारणी करावी. तसेच साताऱ्यात आयटी उद्योग उभारणीसाठी चालना देण्यात यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी देसाई यांच्याकडे केली. या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले.बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील अडचणी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्या सुभाष देसाई यांनी मान्य केल्या असून, साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी आपण तातडीने पावले उचलू,’ अशी ग्वाही देसाई यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)तर बेरोजगारीचा प्रश्न मिटेल! साताऱ्यातील देगाव तर्फ निगडी आदी वाढीव औद्योगिक क्षेत्र विकासासाठी तातडीने प्रयत्न झाल्यास साताऱ्यातील उद्योगाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. नवनवीन उद्योगधंदे साताऱ्यात येतील आणि बेरोजगारीचा प्रश्न मिटेल. देगाव येथील एमआयडीसीसाठी नागरिकांचा विरोध आहे. देगावचा प्रश्न बाजूला ठेवून निगडी एमआयडीसीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा आणि तातडीने प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणीही यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.