शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भरकटलेली एसटी कऱ्हाडात ताळ्यावर

By admin | Updated: August 24, 2015 23:15 IST

प्रांताधिकाऱ्यांची सूचना : स्थलांतराचा विषय थांबवा; अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुरळीत वाहतुकीसाठी पोलीस उपअधीक्षकांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

कऱ्हाड : ‘येथील बसस्थानकाच्या इमारत बांधकामामुळे व्यवस्थापनाने एसटीचे चार पर्यायी बसथांबे तयार करून त्याठिकाणी एसटी थांबविण्यास सुरुवात केली. बसस्थानक व्यवस्थापनाने आपल्या सोयीसाठी कोल्हापूर नाका येथे एसटी थांबविण्याचा केलेला प्रकार प्रवाशांच्या जीवावर बेतणारा तसेच वाहतूक विस्कळीत करणारा आहे. त्यामुळे आता हा बंद करा. एसटी कऱ्हाडातील मूळ बसस्थानकात आणा. त्यासाठी नियोजन करा,’ अशी सूचना प्रांताधिकारी किशोर पवार यांनी केली. कऱ्हाड येथे शासकीय विश्रामगृहात सोमवारी बसस्थानक स्थलांतर व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी किशोर पवार, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस, तहसीलदार राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी प्रशांत रोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कनिष्ठ अभियंता फय्याज मुल्ला, अभियंता प्रियांका काशीद, विभागीय वाहतूक अधिकारी के. टी. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ए. पी. सिद, सार्वजनिक बांधकामचे ए. एम. जाधव, रस्ते विकास महामंडळाचे ए. एस. दंडवते, आगारप्रमुख जे. के. पाटील आदींसह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रांताधिकारी पवार म्हणाले, ‘कऱ्हाड शहरात नवीन बसस्थानक झाल्यास प्रवासी व विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. मात्र, स्थानकाच्या बांधकामास प्रारंभ झाल्यापासून बसस्थानक अधिकाऱ्यांनी प्रवासी व विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले आहे. बसस्थानकात जागा असूनदेखील स्थानक शहराबाहेर हलवून व्यवस्थापनाने चुकीचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर नाका येथील राष्ट्रीय महामार्गलगत थांबा निर्माण करून प्रवाशांच्या मृत्यूस निमंत्रण देण्याचे काम एसटी प्रशासनाने केले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण, आता हे चालू देणार नाही. महामार्गावर एसटी थांबविण्याचा विषय कायमचा बंद करा.’ पोलीस उपअधीक्षक शिवणकर म्हणाल्या, ‘बसस्थानकाच्या स्थलांतरामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. बेशिस्त वाहतुकीवर कारवाई कधी करणार, अशी विचारणा त्यांच्याकडून केली जात आहे. बसस्थानक प्रशासनामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या प्रत्येक गोष्टींना किती दिवस तोंड द्यायचे. परिवहन अधिकारी, पोलीस अधिकारी व पालिका अधिकारी यांचे एक पथक तयार करून शहरातील बेकायदा रिक्षा थांबे, बसस्थानक परिसरातील अतिक्रमण यावर मंगळवारपासून कारवाई करणार आहे.’ यावेळी कृष्णा आॅटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गफार नदाफ यांनी प्रशासनाचे आभार मानले. (प्रतिनिधी)