शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी शहर हादरून गेलं होतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:20 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला सर्वत्र बॉम्बचा वर्षाव सुरू होता. याचे आवाज सतत कानावर पडत होते. अखेर १५ आॅगस्ट हा दिवस उजाडला अन् भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. साताऱ्यात ठिकठिकाणी तिरंगा फडकू लागला. मी ही ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला सर्वत्र बॉम्बचा वर्षाव सुरू होता. याचे आवाज सतत कानावर पडत होते. अखेर १५ आॅगस्ट हा दिवस उजाडला अन् भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. साताऱ्यात ठिकठिकाणी तिरंगा फडकू लागला. मी ही मोठ्या अभिमानाने ध्वजारोहणाला हजेरी लावली अन् यानंतर खºया अर्थाने माझ्या मनात देशसेवेचे बीज रोवले गेले,’ हे वाक्य आहेत माजी सैनिक हारुण मोहंमद मेमन यांचे.हारुण मेमन हे साताºयातील सदर बझार येथे वास्तव्य करीत आहेत. त्यांचा जन्म २५ जानेवारी १९४० रोजी साताºयात झाला. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने मेमन यांच्या मनातही देशसेवेची भावना निर्माण झाली. शिक्षण घेत असतानाच वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ते १९५४ रोजी आर्मीच्या बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये दाखल झाले अन् त्यांचे देशसेवेचे स्वप्न साकार झाले.हारुण मेमन यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळातील काही अनुभव ‘लोकमत’पुढे व्यक्त केले. ते म्हणाले, ‘१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. मी शाळेत जात होतो. भारत स्वातंत्र्य व्हावा, यासाठी सर्वत्र आंदोलने सुरू होती. इंग्रजांविरोधात सर्वत्र बंड पुकारण्यात आले होते. साताºयातही अशीच काहीशी परिस्थिती होती. अखेर असंख्य भारतीयांपुढे ब्रिटिशांना नमते घ्यावे लागले अन् भारत पारतंत्र्यांतून मुक्त झाला. मला आजही तो दिवस वरचेवर आठवत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला साताºयात बॉम्ब फुटल्यासारखे आवाज येत होते. मनामध्ये भीतीचे काहूर माजले होते. सर्वत्र धावपळ सुरू होती. ती रात्र कशीबशी गेली अन् तो दिवस अखेर उजाडला.रेडिओवरून भारत स्वातंत्र्य झाल्याचे वृत्त कानी पडले. सर्वत्र ही बातमी वाºयासारखी पसरली. गल्लीबोळात आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. अनेकांच्या हातात राष्ट्रध्वज अभिमानाने फडकत होता. शहरात एका ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यासाठी माझ्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.भारत-पाकिस्तान युद्धात सहभागहारुण मेमन हे देशसेवा बजावत असताना पुणे, आसाम, इलाहाबाद श्रीनगर आदी ठिकाणी त्यांनी काम केले. तसेच भारत व पाकिस्तान युद्धातही त्यांचा सहभाग घेतला होता. या युद्धात पाकिस्तानला दोनदा भारताने नमवले होते. आपल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना सेना मेडल, रक्षा मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.