शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

एकरकमी एफआरफीसाठी २२ मार्चपासून ‘सह्याद्री’वर बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST

कऱ्हाड : पूर्ण एफआरपी न देणारे साखर कारखाने कायद्याने सरकारचे थकबाकीदार आहेत. त्यामुळे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत ...

कऱ्हाड : पूर्ण एफआरपी न देणारे साखर कारखाने कायद्याने सरकारचे थकबाकीदार आहेत. त्यामुळे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत ज्या कारखान्याची एफआरपी थकलेली आहे, अशा कारखान्यांच्या विद्यमान संचालकांचे अर्ज अपात्र करावेत. तसेच राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी मिळवून देण्याची जबाबदारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची आहे. त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी मिळवून द्यावी या मागणीसाठी २२ मार्च रोजी सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी राजू शेट्टी शुक्रवारी कराडलाे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, उसाला १०० टक्के एफआरपी मिळावी, यासाठी हंगामाच्या सुरुवातीपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठपुरावा करीत आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेला पाठिंबा देत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी देण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ तीन ते चार कारखान्यांनीच पाळले. उर्वरित राज्यातील कारखान्यांनीही १०० टक्के एफआरपी दिलेली नाही. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांची भेट घेऊन एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती; अन्यथा साखर आयुक्तालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेऊन साखर आयुक्तांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त एफआरपी थकवणाऱ्या १३ कारखान्यांना नोटीस बजावल्या आहेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी मिळवून देण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची आहे. मात्र ते नेतृत्व करीत असलेल्या सह्याद्री कारखान्यानेही एफआरपी थकवलेला आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी १०० टक्के एफआरपीची रक्कम मिळवून द्यावी, या मागणीसाठी २२ मार्च रोजी सह्याद्री कारखान्यावर दिवंगत पी. डी. पाटील यांच्या पुतळ्याशेजारी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

चौकट

वीजग्राहकांचा विश्वासघात

लॉकडाऊन काळातील एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील घरगुती वीजबिल माफ करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. त्यासाठी अनेक आंदोलने केली. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत गोड बातमी देणार असल्याचे सांगितले होते. आता मात्र थकीत ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा वीजग्राहकांचा विश्वासघात आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.