शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

एकरकमी एफआरफीसाठी २२ मार्चपासून ‘सह्याद्री’वर बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST

कऱ्हाड : पूर्ण एफआरपी न देणारे साखर कारखाने कायद्याने सरकारचे थकबाकीदार आहेत. त्यामुळे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत ...

कऱ्हाड : पूर्ण एफआरपी न देणारे साखर कारखाने कायद्याने सरकारचे थकबाकीदार आहेत. त्यामुळे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत ज्या कारखान्याची एफआरपी थकलेली आहे, अशा कारखान्यांच्या विद्यमान संचालकांचे अर्ज अपात्र करावेत. तसेच राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी मिळवून देण्याची जबाबदारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची आहे. त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी मिळवून द्यावी या मागणीसाठी २२ मार्च रोजी सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी राजू शेट्टी शुक्रवारी कराडलाे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, उसाला १०० टक्के एफआरपी मिळावी, यासाठी हंगामाच्या सुरुवातीपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठपुरावा करीत आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेला पाठिंबा देत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी देण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ तीन ते चार कारखान्यांनीच पाळले. उर्वरित राज्यातील कारखान्यांनीही १०० टक्के एफआरपी दिलेली नाही. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांची भेट घेऊन एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती; अन्यथा साखर आयुक्तालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेऊन साखर आयुक्तांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त एफआरपी थकवणाऱ्या १३ कारखान्यांना नोटीस बजावल्या आहेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी मिळवून देण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची आहे. मात्र ते नेतृत्व करीत असलेल्या सह्याद्री कारखान्यानेही एफआरपी थकवलेला आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी १०० टक्के एफआरपीची रक्कम मिळवून द्यावी, या मागणीसाठी २२ मार्च रोजी सह्याद्री कारखान्यावर दिवंगत पी. डी. पाटील यांच्या पुतळ्याशेजारी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

चौकट

वीजग्राहकांचा विश्वासघात

लॉकडाऊन काळातील एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील घरगुती वीजबिल माफ करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. त्यासाठी अनेक आंदोलने केली. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत गोड बातमी देणार असल्याचे सांगितले होते. आता मात्र थकीत ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा वीजग्राहकांचा विश्वासघात आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.