शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

ग्रामसेवकांवर वाढतोय राजकीय दबाव

By admin | Updated: November 16, 2015 23:41 IST

ग्रामस्थांची होते फरफट : सत्ताधाऱ्यांच्या ओझ्याखाली दबूनच करावी लागतात कामे

प्रताप बडेकर - कासेगाव --स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य घटक म्हणून कार्यरत असणारे ग्रामसेवक तथा अण्णासाहेब यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे. सर्वसामान्यांची कामे करण्याची इच्छा असूनही सत्ताधारी सांगतील त्याप्रमाणेच कामे करावी लागत आहेत. हे चित्र गावोगावी दिसत असून, अण्णासाहेब सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनत चालले आहेत.राज्याने पंचायत राज धोरण स्वीकारल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आली. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व गावपातळीवर ग्रामपंचायत उदयास आली. या ग्रामपंचायतीसाठी दैनंदिन कामासाठी सचिव म्हणून ग्रामसेवक हे पद निर्माण केले. शासकीय पातळीवरून येणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत व योग्य गरजूंना त्याचा लाभ व्हावा, हे शासनाचे धोरण असते.मात्र गावपातळीवर ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीप्रमाणे ज्याची गावावर सत्ता त्याच्या म्हणण्यानुसारच व तो सांगेल त्यालाच या योजनांचा लाभ, असे चित्र सर्वत्र दिसत आहे. गावपातळीवर या योजनांची माहिती लोकांना देण्याचे काम ग्रामसेवक करत असतात. या कामाच्या माध्यमातून गावातील लोकांचा त्यांच्याशी संपर्क असतो. मात्र सात्ताधारी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या मर्जीतल्या लोकांचीच यासाठी निवड करताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छा असूनही अण्णासाहेबांना सत्ताधाऱ्यांपुढे जाता येत नाही. तसेच मासिक सभा, ग्रामसभा आदी सभांचे प्रोसेडिंग व त्यातील ठराव याबाबतही त्यांना सत्ताधाऱ्यांचेच ऐकावे लागते.वास्तविक शासन स्तरावरून येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा गरजूंना फायदा होणे गरजेचे असताना गावोगावचे अण्णासाहेब मात्र इच्छा असूनही कामे करू शकत नाहीत. त्यामुळे हे अण्णासाहेब सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. याला कुठे तरी आळा बसण्याची गरज आहे. अन्यथा ग्रामीण विकासाला त्याचा फटका बसेल.अधिकाऱ्यांवर मर्यादा..!काही ग्रामसेवक मोठ्या तडफेने व प्रामाणिकपणे कामे करतात. यामुळे काही वेळेस सत्ताधारी गट व ग्रामसेवकांत संघर्ष होतो. यातूनच सत्ताधारी संबंधित ग्रामसेवकाची बदली अथवा त्याला बडतर्फ करण्यासाठी व्यूहरचना आखतात, अशी उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही मर्यादा येत आहेत.