शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

ग्रामसेवकांवर वाढतोय राजकीय दबाव

By admin | Updated: November 16, 2015 23:41 IST

ग्रामस्थांची होते फरफट : सत्ताधाऱ्यांच्या ओझ्याखाली दबूनच करावी लागतात कामे

प्रताप बडेकर - कासेगाव --स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य घटक म्हणून कार्यरत असणारे ग्रामसेवक तथा अण्णासाहेब यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे. सर्वसामान्यांची कामे करण्याची इच्छा असूनही सत्ताधारी सांगतील त्याप्रमाणेच कामे करावी लागत आहेत. हे चित्र गावोगावी दिसत असून, अण्णासाहेब सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनत चालले आहेत.राज्याने पंचायत राज धोरण स्वीकारल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आली. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व गावपातळीवर ग्रामपंचायत उदयास आली. या ग्रामपंचायतीसाठी दैनंदिन कामासाठी सचिव म्हणून ग्रामसेवक हे पद निर्माण केले. शासकीय पातळीवरून येणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत व योग्य गरजूंना त्याचा लाभ व्हावा, हे शासनाचे धोरण असते.मात्र गावपातळीवर ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीप्रमाणे ज्याची गावावर सत्ता त्याच्या म्हणण्यानुसारच व तो सांगेल त्यालाच या योजनांचा लाभ, असे चित्र सर्वत्र दिसत आहे. गावपातळीवर या योजनांची माहिती लोकांना देण्याचे काम ग्रामसेवक करत असतात. या कामाच्या माध्यमातून गावातील लोकांचा त्यांच्याशी संपर्क असतो. मात्र सात्ताधारी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या मर्जीतल्या लोकांचीच यासाठी निवड करताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छा असूनही अण्णासाहेबांना सत्ताधाऱ्यांपुढे जाता येत नाही. तसेच मासिक सभा, ग्रामसभा आदी सभांचे प्रोसेडिंग व त्यातील ठराव याबाबतही त्यांना सत्ताधाऱ्यांचेच ऐकावे लागते.वास्तविक शासन स्तरावरून येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा गरजूंना फायदा होणे गरजेचे असताना गावोगावचे अण्णासाहेब मात्र इच्छा असूनही कामे करू शकत नाहीत. त्यामुळे हे अण्णासाहेब सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. याला कुठे तरी आळा बसण्याची गरज आहे. अन्यथा ग्रामीण विकासाला त्याचा फटका बसेल.अधिकाऱ्यांवर मर्यादा..!काही ग्रामसेवक मोठ्या तडफेने व प्रामाणिकपणे कामे करतात. यामुळे काही वेळेस सत्ताधारी गट व ग्रामसेवकांत संघर्ष होतो. यातूनच सत्ताधारी संबंधित ग्रामसेवकाची बदली अथवा त्याला बडतर्फ करण्यासाठी व्यूहरचना आखतात, अशी उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही मर्यादा येत आहेत.