शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

खासगी रुग्णालयात क्षयरुग्ण नोंदणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:39 IST

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सरकारचे २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट असतानाही अनेक रुग्णालयांकडून क्षयरोग ...

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सरकारचे २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट असतानाही अनेक रुग्णालयांकडून क्षयरोग रुग्णांची वास्तविक संख्या दिली जात नव्हती. त्यावर केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा केल्यानंतर खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपचार करत असलेल्या रुग्णांची माहिती निक्षय पोर्टलवर भरण्यास सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘क्षयमुक्त भारत’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढली आहे.देशामध्ये क्षयरोगाने अनेकजण भविष्याच्या चिंतेत आपले जीवन कंठित आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाल्याचे वास्तव समोर असताना खासगी रुग्णालयांकडून त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची संख्या शासन पातळीवर उपलब्ध होत नव्हती, त्यामुळे सरकारच्या २०२५ च्या क्षयमुक्त भारतच्या उद्दिष्टाला खीळ बसत होती, यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने १६ मार्च २०१८ रोजी एक अध्यादेश काढून क्षयरोग रुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिक, औषध विक्रेते, प्रयोगशाळा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २६९ व २७ नुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती दिली, त्यामुळे सातारा जिल्ह्यात सरकारी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ९१७ तर खासगी रुग्णालयातील क्षयरुग्णांची १ हजार ८१६ अशी एकूण ३ हजार ७३३ रुग्णांपर्यंत पोहोचली आहे.लहान मुले, तरुणांच्या प्रमाण वाढलहान मुले आणि तरुणांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढले असून, ही चिंताजनक बाब आहे. पुरेसा आणि योग्य प्रमाणात आहार न घेणे, आहारात पालेभाज्या नसणे, मैदानावरचे खेळ न खेळणे यामुळे या मुलांमधील रोगप्रतिकारकशक्ती अतिशय कमी झाली आहे. यामुळेच या मुलांना क्षयरोगाच्या विषाणूची बाधा लवकर होत असल्याचे डॉक्टर सांगतात.क्षयरोग रुग्णशोध मोहीम सुरूआरोग्य विभागाच्या वतीने १२ ते २४ नोव्हेंबरपर्यंत क्षयरोग रुग्णशोध मोहीम राबवण्यात येणार आहे. मोहिमेमध्ये जोखीमग्रस्त भागामधील कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची तपासणी करून, संशयित रुग्णावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत, यासाठी आशा कर्मचारी व स्वयंसेवक अशा एकूण १ हजार १४८ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.