शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

सोयाबीन खाद्यतेल दरामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST

सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून, गत आठवड्यात मागणी वाढल्याने सोयाबीन तेलाच्या दरात डब्यामागे ५० रुपयांची ...

सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून, गत आठवड्यात मागणी वाढल्याने सोयाबीन तेलाच्या दरात डब्यामागे ५० रुपयांची वाढ झाली तर इतर खाद्यतेलांचा दर स्थिर राहिला. तसेच वाटाणा वगळता इतर पालेभाज्यांना भाव कमी मिळू लागला आहे. सातारा बाजार समितीत गुरुवारी आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक प्रमाणात असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येतो. मागील काही दिवसात ही आवक कमी झाली आहे. सातारा बाजार समितीत रविवारी ६०६ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १६९, बटाटा १०५, लसूण १६ आणि आल्याची ४ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, चिकू, खरबूज, कलिंगड यांचीही आवक झाली. तरीही आंबा आणि कलिंगडाची आवक अधिक राहिली.

सोयाबीन तेल डबा २४००

खाद्यतेलाचे दर सध्या तेजीत आहेत. त्यामुळे शेंगदाणा व सूर्यफूल तेलांचे ग्राहक सोयाबीनकडे काही प्रमाणात वळले आहेत. सोयाबीन तेलाच्या डब्यामागे सरासरी ५० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीनचा डबा २,४०० ते २,४५० रुपयांपर्यंत मिळत आहे. पामतेल २ हजार रुपये, सूर्यफूल २,५०० ते २,५५० आणि शेंगदाणा तेल डबा २,५५० ते २,७०० रुपयांपर्यंत मिळत आहे.

आंब्याची आवक वाढली

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, टरबूजची आवक होत आहे. या रविवारी आंब्याची २७ आणि कलिंगडाची ३६ क्विंटलची आवक झाली. द्राक्षाची आवक झाली नाही.

मिरची दर कमी

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ८० ते १००, फ्लॉवर १०० ते १२०, दोडका २०० ते २५०, मिरचीला १०० ते १५० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १,२०० व लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोट :

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. ठराविक वेळेतच भाजीपाला खरेदी करावा लागतो. मंडई बंद आहेत. पेठेत विक्रेते येतात. त्यांच्याकडून खरेदी करतो. मंडईपेक्षा दर अधिक असतो.

- शामराव पवार, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. दरात तेजी असल्याने सोयाबीन तेलाला मागणी आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाच्या दरात वाढ झाली आहे. इतर तेलांचे भाव स्थिर आहेत.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने भाज्यांना मागणी कमीच आहे. बाजार समितीतही शेतमालाला दर कमी आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तरी निघणार का, हा प्रश्न आहे.

- राजाराम पाटील, शेतकरी

फोटो जावेदचा कांद्याचा तीन काॅलम घ्यावा...