शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन खाद्यतेल दरामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST

सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून, गत आठवड्यात मागणी वाढल्याने सोयाबीन तेलाच्या दरात डब्यामागे ५० रुपयांची ...

सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून, गत आठवड्यात मागणी वाढल्याने सोयाबीन तेलाच्या दरात डब्यामागे ५० रुपयांची वाढ झाली तर इतर खाद्यतेलांचा दर स्थिर राहिला. तसेच वाटाणा वगळता इतर पालेभाज्यांना भाव कमी मिळू लागला आहे. सातारा बाजार समितीत गुरुवारी आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक प्रमाणात असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येतो. मागील काही दिवसात ही आवक कमी झाली आहे. सातारा बाजार समितीत रविवारी ६०६ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १६९, बटाटा १०५, लसूण १६ आणि आल्याची ४ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, चिकू, खरबूज, कलिंगड यांचीही आवक झाली. तरीही आंबा आणि कलिंगडाची आवक अधिक राहिली.

सोयाबीन तेल डबा २४००

खाद्यतेलाचे दर सध्या तेजीत आहेत. त्यामुळे शेंगदाणा व सूर्यफूल तेलांचे ग्राहक सोयाबीनकडे काही प्रमाणात वळले आहेत. सोयाबीन तेलाच्या डब्यामागे सरासरी ५० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीनचा डबा २,४०० ते २,४५० रुपयांपर्यंत मिळत आहे. पामतेल २ हजार रुपये, सूर्यफूल २,५०० ते २,५५० आणि शेंगदाणा तेल डबा २,५५० ते २,७०० रुपयांपर्यंत मिळत आहे.

आंब्याची आवक वाढली

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, टरबूजची आवक होत आहे. या रविवारी आंब्याची २७ आणि कलिंगडाची ३६ क्विंटलची आवक झाली. द्राक्षाची आवक झाली नाही.

मिरची दर कमी

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ८० ते १००, फ्लॉवर १०० ते १२०, दोडका २०० ते २५०, मिरचीला १०० ते १५० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १,२०० व लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोट :

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. ठराविक वेळेतच भाजीपाला खरेदी करावा लागतो. मंडई बंद आहेत. पेठेत विक्रेते येतात. त्यांच्याकडून खरेदी करतो. मंडईपेक्षा दर अधिक असतो.

- शामराव पवार, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. दरात तेजी असल्याने सोयाबीन तेलाला मागणी आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाच्या दरात वाढ झाली आहे. इतर तेलांचे भाव स्थिर आहेत.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने भाज्यांना मागणी कमीच आहे. बाजार समितीतही शेतमालाला दर कमी आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तरी निघणार का, हा प्रश्न आहे.

- राजाराम पाटील, शेतकरी

फोटो जावेदचा कांद्याचा तीन काॅलम घ्यावा...