शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अधिकाऱ्यांच्या मक्तेदारीत वाढ

By admin | Updated: July 22, 2015 23:56 IST

सुरेश ढवळ यांचा आरोप : जिल्हा परिषद वित्त समिती सभा

ओरोस : जिल्हा परिषदेच्या अनेक ठिकाणच्या कार्यालयातील एकाच टेबलावर बरीच वर्षे काम करत राहिलेल्या अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढली आहे. संबंधित अधिकारी हे स्वत: मालक असल्यासारखे वागतात. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे एकाच जागी बरीच वर्षे असलेल्या अधिकाऱ्यांची टेबले त्वरित बदला अशी मागणी सदस्य सुरेश ढवळ यांनी सभेत केली.जिल्हा परिषदेची वित्त समितीची सभा बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती संजय बोंबडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवळ, भगवान फाटक, सुभाष नार्वेकर, रिटा अल्फान्सो, समिती सचिव तसेच वित्त अधिकारी मारुती कांबळे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये काही अधिकारी कित्येक वर्षे एकाच जागेवर कार्यरत आहेत. एकाच टेबलावर बरीच वर्षे असल्याने आपणच या कामाचे अधिकारी, आपणच मालक, आपणच टेबलावर राजे अशाप्रकारे वागत असल्याचा आरोप सदस्य सुरेश ढवळ यांनी या सभेत उपस्थित केला. तसेच या अधिकाऱ्यांची मक्तेदारी ही वाढली आहे. सर्वसामान्य जनतेची कामे करायला दोन ते तीन महिने कालावधी लावतात. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका येथील सर्वसामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे बरीच वर्षे एकाच जागेवर असणाऱ्या अधिकाऱ्यांची टेबले तत्काळ बदलावी किंवा त्यांना ३ ते ५ वर्षांनंतर शासनाच्या बदली प्रक्रियेत घेण्यात यावे, अशी मागणीही सुरेश ढवळ यांनी सभेत केली.गिरीराज व संकरीत कुक्कुट पक्षांची जिल्ह्यात मागणी कमी तसेच विक्रीही होत नाही. त्यामुळे यापुढे जिल्ह्याला गिरीराज व संकरीत पक्षांऐवजी गावठी कुक्कुट पिल्लांचा पुरवठा करण्यात यावा असा ठराव सभेत घेण्यात आला. त्याचप्रमाणे गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या गिरीराज व संकरीत पिल्लांचे पुढे काय झाले? किती फायदा झाला याचा अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती संजय बोंबडी यांनी दिले.शासकीय रेस्ट हाऊस बंद असल्यास उत्पन्न मिळत नसेल तर ते चालविण्यास देणे, पर्यटन विभागाने जिल्हा परिषदेसाठी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावा. अशा अनेक विषयांवर सभेत चर्चा झाली. (वार्ताहर)दुर्धर आजारग्रस्तांचे ४0 प्रस्ताव प्राप्तजूनअखेर खर्चाचा आढावा घेतला असता हस्तांतरीत योजनेंतर्गत १ कोटी २६ लाखापैकी १ कोटी २ लाखांचा निधी खर्च झाला आहे. अभिकरण योजना ६ कोटी ९ लाखापैकी ४ कोटी ३६ लाख खर्च, जिल्हा परिषद स्वउत्पन्न १२ कोटी ८८ लाखापैकी १ कोटी ६ लाख खर्च, दुरुस्ती देखभाल ४८ लाखापैकी २८ लाख खर्च, खासदार निधी ७७ लाखापैकी २३ लाख १२ हजार खर्च तर राष्ट्रीय पेयजल ६ कोटी ४४ लाखांपैकी ३ कोटी ५० लाख एवढा निधी खर्च झाला असल्याची माहिती सभेत देण्यात आली.दुर्धर आजारग्रस्त रुग्णांचे ४० प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १२ प्रस्ताव परिपूर्ण असून उर्वरित जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रमाणपत्रासाठी सादर करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र मिळताच संबंधितांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सभेत दिली.