शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘ओव्हरलोड’मुळे अपघातांच्या घटनांत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST

औंध : उसाचा हंगाम सगळीकडे सुरू आहे. खटाव तालुक्यात तीन साखर कारखाने जोमाने ऊस गाळप करीत आहेत. त्यापटीत ऊस ...

औंध : उसाचा हंगाम सगळीकडे सुरू आहे. खटाव तालुक्यात तीन साखर कारखाने जोमाने ऊस गाळप करीत आहेत. त्यापटीत ऊस वाहतूकही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवडाभरात औंध परिसरात पाच ते सहा ठिकाणी उसाच्या ट्रॉल्या पलटल्याच्या घटना घडल्या आहेत. ओव्हरलोड ऊस वाहतूक करण्याच्या नादात उसाचे ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटनांत वाढ झाली असून, यामध्ये शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.

औंधसह परिसरात सध्या ऊसशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात तीन कारखाने असूनही इतर ठिकाणच्या कारखान्यांच्या टोळ्याही ऊसतोड करीत आहेत. येथील शेतकरी मोठ्या कष्टाने ऊसशेती करू लागला आहे. ऊसतोडणीसाठी चकरा मारून टोळी आपल्या शेतात पोहोचेपर्यंत शेतकऱ्याचा घाम निघू लागला आहे. यातच आणखी एक धाकधूक त्याला सतावत असते, ती म्हणजे आपला ऊस तोडून कारखान्यात आत जाईपर्यंत व्यवस्थित जावा, कुठेही वाहन पलटी अथवा एखादा अनर्थ घडू नये, याच काळजीत तो असतो.

ऊस वाहतूकदार, टोळीचालक आपले ऊस वाहतुकीचे टार्गेट पूर्ण व्हावे, यासाठी धडपड करीत असतो. यासाठी तो क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करण्याचे धाडस करतो. प्रत्येक वेळेस त्याचा आत्मविश्वास कामी येतोच, असे घडत नसते. मग कुठेतरी झोला बसणे, ऊस बांधलेल्या दोऱ्या निसटणे, चढाला अथवा उताराला ट्रॉली पलटी होणे, अरुंद रस्त्यावरून जाताना अपघात होणे, यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस निम्याच्या वर नुकसानीत जातो. गत आठवड्यात गोपूज पुसेसावळी रस्त्यावर ठिकठिकाणी उसाचे ढीग दिसत होते, तर निम्म्यापेक्षा जास्त ऊस त्यावरून वाहने गेल्यामुळे खराब झाला होता. त्यामुळे ऊस वाहतूक करताना ओव्हरलोड वाहतूक टाळून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, ही माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोट..

याबाबत आम्ही तालुक्यातील सगळ्या कारखाना व्यवस्थापनांशी चर्चा करणार आहोत. शेतकऱ्यांचे वारंवार जर ओव्हरलोड वाहतुकीमुळे नुकसान होत असेल, तर त्यावर तोडगा निघणे गरजेचे आहे.

- दत्तात्रय घार्गे,

खटाव तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

०३औंध

खटाव तालुक्यात गत आठवड्यात उसाची ट्रॉली पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. (छाया : रशीद शेख)