शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘ओव्हरलोड’मुळे अपघातांच्या घटनांत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST

औंध : उसाचा हंगाम सगळीकडे सुरू आहे. खटाव तालुक्यात तीन साखर कारखाने जोमाने ऊस गाळप करीत आहेत. त्यापटीत ऊस ...

औंध : उसाचा हंगाम सगळीकडे सुरू आहे. खटाव तालुक्यात तीन साखर कारखाने जोमाने ऊस गाळप करीत आहेत. त्यापटीत ऊस वाहतूकही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवडाभरात औंध परिसरात पाच ते सहा ठिकाणी उसाच्या ट्रॉल्या पलटल्याच्या घटना घडल्या आहेत. ओव्हरलोड ऊस वाहतूक करण्याच्या नादात उसाचे ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटनांत वाढ झाली असून, यामध्ये शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.

औंधसह परिसरात सध्या ऊसशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात तीन कारखाने असूनही इतर ठिकाणच्या कारखान्यांच्या टोळ्याही ऊसतोड करीत आहेत. येथील शेतकरी मोठ्या कष्टाने ऊसशेती करू लागला आहे. ऊसतोडणीसाठी चकरा मारून टोळी आपल्या शेतात पोहोचेपर्यंत शेतकऱ्याचा घाम निघू लागला आहे. यातच आणखी एक धाकधूक त्याला सतावत असते, ती म्हणजे आपला ऊस तोडून कारखान्यात आत जाईपर्यंत व्यवस्थित जावा, कुठेही वाहन पलटी अथवा एखादा अनर्थ घडू नये, याच काळजीत तो असतो.

ऊस वाहतूकदार, टोळीचालक आपले ऊस वाहतुकीचे टार्गेट पूर्ण व्हावे, यासाठी धडपड करीत असतो. यासाठी तो क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करण्याचे धाडस करतो. प्रत्येक वेळेस त्याचा आत्मविश्वास कामी येतोच, असे घडत नसते. मग कुठेतरी झोला बसणे, ऊस बांधलेल्या दोऱ्या निसटणे, चढाला अथवा उताराला ट्रॉली पलटी होणे, अरुंद रस्त्यावरून जाताना अपघात होणे, यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस निम्याच्या वर नुकसानीत जातो. गत आठवड्यात गोपूज पुसेसावळी रस्त्यावर ठिकठिकाणी उसाचे ढीग दिसत होते, तर निम्म्यापेक्षा जास्त ऊस त्यावरून वाहने गेल्यामुळे खराब झाला होता. त्यामुळे ऊस वाहतूक करताना ओव्हरलोड वाहतूक टाळून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, ही माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोट..

याबाबत आम्ही तालुक्यातील सगळ्या कारखाना व्यवस्थापनांशी चर्चा करणार आहोत. शेतकऱ्यांचे वारंवार जर ओव्हरलोड वाहतुकीमुळे नुकसान होत असेल, तर त्यावर तोडगा निघणे गरजेचे आहे.

- दत्तात्रय घार्गे,

खटाव तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

०३औंध

खटाव तालुक्यात गत आठवड्यात उसाची ट्रॉली पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. (छाया : रशीद शेख)