शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

घडतंय-बिघडतंय : वारुंजी ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांच्यातच धुसफूस!

By प्रमोद सुकरे | Updated: July 12, 2023 22:23 IST

धूर बाहेर येऊ लागल्याने उलटसुलट चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : कऱ्हाड शहरालगत उपनगर म्हणून वारुंजी गावची ओळख आहे. परिणामी, येथील राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष कायम लागून राहिलेले असते. येथील ग्रामपंचायतीत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली तरी त्यांच्यातच अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्याचा धूरही आता बाहेर यायला लागला आहे. त्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.

वारुंजी ग्रामपंचायतीत एकूण १५ ग्रामपंचायत सदस्य आहेत. पैकी १२ काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर ३ सदस्य भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले गटाचे मानले जातात. निवडणुकीनंतर पहिल्यांदा काँग्रेसच्या शकुंतला पवार यांची सरपंच म्हणून तर राष्ट्रवादीचे नेते आमदार बाळासाहेब पाटील यांचे भाचे अनूज पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मध्यंतरी पहिल्या सरपंचांनी राजीनामा दिला त्या जागी सुप्रिया पाटील यांची नव्याने सरपंच म्हणून निवड करण्यात आली. तर उपसरपंच अनूज पाटीलच राहिले. आता सत्ताधारी गटातील अनेकांना उपसरपंच व्हावे, असे वाटू लागले आहे. त्यामुळेच ही धुसफूस सुरू झाल्याचे बोलले जाते. त्यांनी काँग्रेसचे स्थानिक नेते नामदेव पाटील यांच्याकडे ही खदखद व्यक्त केल्याचे समजते. आता ते काय निर्णय घेणार? हे पाहावे लागेल.उपसरपंचांच्या विरोधात अर्ज..उपसरपंच अनूज पाटील यांच्या विरोधात तब्बल १० सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे एक अर्ज दाखल केला आहे. त्यात अनूज पाटील उपसरपंच पदाचा गैरवापर करीत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे.इथून झाली पाणी मुरायला सुरुवात...वारुंजी ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशनमधून पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली आहे; पण त्याच्या भूमिपूजनाचे वारुंजीत दोन स्वतंत्र नारळ फुटले. नामदेव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तर उपसरपंच अनूज पाटील यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दुसरा कार्यक्रम घेतला.अन् समीकरणे बदलायला लागली..ग्रामपंचायतीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे १२ तर भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे गटाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीतच धुसफूस सुरू झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वारुंजीतील कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबतच भाजपच्या गटाचे सदस्यही कार्यक्रमाला हजर दिसले.भविष्यातील राजकारणावर परिणाम...वारुंजी गाव जिल्हा परिषद गटातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते. नजीकच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे चित्र आहे; पण वारुंजीतील या धुसफुसीचे पडसाद त्यावेळी त्या निवडणुकीत उमटले तर आश्चर्य वाटायला नको.