शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

घडतंय-बिघडतंय : वारुंजी ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांच्यातच धुसफूस!

By प्रमोद सुकरे | Updated: July 12, 2023 22:23 IST

धूर बाहेर येऊ लागल्याने उलटसुलट चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : कऱ्हाड शहरालगत उपनगर म्हणून वारुंजी गावची ओळख आहे. परिणामी, येथील राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष कायम लागून राहिलेले असते. येथील ग्रामपंचायतीत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली तरी त्यांच्यातच अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्याचा धूरही आता बाहेर यायला लागला आहे. त्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.

वारुंजी ग्रामपंचायतीत एकूण १५ ग्रामपंचायत सदस्य आहेत. पैकी १२ काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर ३ सदस्य भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले गटाचे मानले जातात. निवडणुकीनंतर पहिल्यांदा काँग्रेसच्या शकुंतला पवार यांची सरपंच म्हणून तर राष्ट्रवादीचे नेते आमदार बाळासाहेब पाटील यांचे भाचे अनूज पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मध्यंतरी पहिल्या सरपंचांनी राजीनामा दिला त्या जागी सुप्रिया पाटील यांची नव्याने सरपंच म्हणून निवड करण्यात आली. तर उपसरपंच अनूज पाटीलच राहिले. आता सत्ताधारी गटातील अनेकांना उपसरपंच व्हावे, असे वाटू लागले आहे. त्यामुळेच ही धुसफूस सुरू झाल्याचे बोलले जाते. त्यांनी काँग्रेसचे स्थानिक नेते नामदेव पाटील यांच्याकडे ही खदखद व्यक्त केल्याचे समजते. आता ते काय निर्णय घेणार? हे पाहावे लागेल.उपसरपंचांच्या विरोधात अर्ज..उपसरपंच अनूज पाटील यांच्या विरोधात तब्बल १० सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे एक अर्ज दाखल केला आहे. त्यात अनूज पाटील उपसरपंच पदाचा गैरवापर करीत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे.इथून झाली पाणी मुरायला सुरुवात...वारुंजी ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशनमधून पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली आहे; पण त्याच्या भूमिपूजनाचे वारुंजीत दोन स्वतंत्र नारळ फुटले. नामदेव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तर उपसरपंच अनूज पाटील यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दुसरा कार्यक्रम घेतला.अन् समीकरणे बदलायला लागली..ग्रामपंचायतीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे १२ तर भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे गटाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीतच धुसफूस सुरू झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वारुंजीतील कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबतच भाजपच्या गटाचे सदस्यही कार्यक्रमाला हजर दिसले.भविष्यातील राजकारणावर परिणाम...वारुंजी गाव जिल्हा परिषद गटातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते. नजीकच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे चित्र आहे; पण वारुंजीतील या धुसफुसीचे पडसाद त्यावेळी त्या निवडणुकीत उमटले तर आश्चर्य वाटायला नको.