शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

अतिक्रमण काढल्यानंतर रुंदीकरणाला मुहूर्त

By admin | Updated: July 10, 2015 22:16 IST

शिरवळ : भूसंपादनची कार्यवाहीही पूर्ण; अनेक दिवसांची रस्त्याची मागणी मार्गी

शिरवळ : शिरवळ, ता. खंडाळा येथील ग्रामस्थांची रस्ता रुंदीकरणाची मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी धडक कारवाईची सूचना केली. त्यानंतर तत्परतेने भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी भूसंपादनाची कारवाई पूर्ण करीत अतिक्रमणधारकांना नोटीस दिली. त्यामुळे शिरवळ येथील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याच्या रुंदीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सध्या रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाल्याने शिरवळकरांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे महामार्गाचे काम सुरू झाल्याने आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांनाही यश आले आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या सहापदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिरवळ याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून अनेक ठिकाणी अपूर्ण कामे ठेवण्यात आली होती. तसेच शिर्के पेपर मिल ते शिरवळ गावात येणारा सर्व्हिस रस्ता मोठ्या प्रमाणात अरुंद करण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली होती. तर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या कारणामुळे शिरवळ ग्रामस्थांनी सर्वपक्षीय आंदोलन करीत शिरवळ येथील महामार्गालगतचे काम घेतलेल्या रिलायन्सच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याबरोबर शिरवळ ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अमृत नाटेकर यांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार अमृत नाटेकर यांनी ग्रामस्थांसमवेत शिरवळ परिसरातील महामार्गांची पाहणी करीत दि. ९ पासून कायदेशीर बाबी पूर्ण करून सर्व्हिस रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.या आश्वासनानुसार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी शिरवळ परिसरातील अतिक्रमणधारकांना दणका दिला. त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या. शिर्के पेपर मिल जवळील सर्व्हिस रस्त्त्याचे व पुलाच्या कामाच्या रुंदीकरणाची सुरुवात करीत शिरवळकरांना सुखद धक्का दिला आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी नाटेकर यांच्या समवेत खंडाळा तहसीलदार शिवाजीराव तळपे, पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, शिरवळचे उपसरपंच उदय कबुले, राजेंद्र तांबे, रिलायन्सचे बिजेंद्रकिशोर सिंग, बी. के. सिंग, संपत मगर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)खंडाळा तालुक्यातील शिरवळ ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिलेल्या सुचनेनुसार सर्व कायेदीशर कार्यवाही पूर्ण केली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदीकरणाच्या रस्ता रुंदीकरणाची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर केसुर्डीजवळील व पारगाव येथील कायदेशीर कार्यवाहीही पूर्ण झाली आहे. त्याठिकाणीही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झालेले आहे. त्यासाठी वनविभागाची ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याने केसुर्डीजवळील अपूर्ण पुलाचे लवकर काम सुरू होईल. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही.-अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)शिरवळचे शेतकरी व नागरिकांची अपूर्ण कामामुळे मोठ्या प्रमाणात अडचण होत होती. शिरवळ येथील महामार्ग रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने अनेक समस्यांना पायबंद बसणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन मार्ग सुखकर होणार आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व आमदार मकरंद पाटील यांच्या सहकार्यामुळे व प्रयत्नामुळे हे होऊ शकले.-उदय कबुले, उपसरपंच शिरवळ