शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

फलटण-बारामती रेल्वेमार्गाचे काम त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST

फलटण : फलटण ते बारामती या रेल्वेमार्गाचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडले आहे. या कामाला त्वरित गती देऊन हा मार्ग ...

फलटण : फलटण ते बारामती या रेल्वेमार्गाचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडले आहे. या कामाला त्वरित गती देऊन हा मार्ग लवकर पूर्ण करावा, तसेच या रेल्वेमार्गासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी अपेक्षा सोलापूर रेल्वे विभागाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.

येथील तहसील कार्यालयात फलटण ते बारामती रेल्वेसंदर्भात वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, वरिष्ठ रेल्वे व्यवस्थापक सुनील मिश्रा, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक मनोरंजन कुमार, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार समीर यादव आदी उपस्थित होते.

लोणंद ते फलटण या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन या मार्गावर रेल्वेसेवाही सुरू झाली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात रेल्वे बंद पडली असली तरी फलटण ते पुणे अशी रेल्वे आपण मागणी केल्याप्रमाणे लवकरच सुरू होणार आहे. फलटण आणि सुरवडी रेल्वेस्टेशनवरील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच इमारतीची रंगरोगोटी करावी. फलटण रेल्वेस्टेशनवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिले.

फलटण ते बारामती या रेल्वेमार्गाचे काम खूपच संथगतीने चालू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून भूसंपादनाचे प्रश्न शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करून सोडवावेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष संपर्क साधावा. ज्या काही अडचणी फलटण ते बारामती या दरम्यान येत आहे. त्याबाबत सातारा व पुणेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, या मार्गाने काम लवकर होण्यासाठी सर्वांशी समन्वय ठेवणारा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी अपेक्षा खा. रणजितसिंह यांनी व्यक्त केली.

रेणू शर्मा यांनी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून फलटण ते बारामती रेल्वेमार्गावर येणाऱ्या अडचणी त्वरित दूर केल्या जातील. फलटण ते लोणंद रेल्वेमार्गाची पुन्हा पाहणी करून या मार्गावरील सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. बैठकीनंतर फलटण रेल्वेस्टेशनची अधिकाऱ्यांसोबत खा. रणजितसिंह यांनी पाहणी करून स्टेशनचे सुशोभिकरण करण्याचे आदेश दिले.

चौकट...

अधिकाऱ्यांनी अडचणींचा बाऊ करू नये....

फलटण ते बारामती हा रेल्वेमार्ग झाल्यास दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्यासाठी कमी वेळ लागणार आहे तसेच शेतकऱ्यांचा भाजीपाला लवकर मोठ्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी मदत होणार असून या मार्गामुळे पुणे रेल्वेस्टेशनवर पडणारा अतिभार कमी होणार आहे. फलटण ते बारामती रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकार निधी देण्यात कमी पडणार नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी अडचणींचा बाऊ करू नये. हा रेल्वेमार्ग लवकर कसा पूर्ण होईल, याकडे जातीने लक्ष द्यावे. आदर्की रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रवाशांची दमछाक होत असून, एक तर हा रेल्वेमार्ग बदलावा किंवा रेल्वेने आदर्की गावातून रेल्वेस्टेशनपर्यंत रस्ता त्वरित करावा, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही खा. रणजितसिंह यांनी दिली.