शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

दुर्लक्षामुळे खांदेकऱ्यांचा पाय खोलात !

By admin | Updated: August 31, 2014 23:30 IST

अंबेदरे ग्रामस्थांची व्यथा : अरुंद पाणंद रस्त्यामुळे पार्थिवाची हेळसांड

सातारा : सातारा शहरालगत असलेल्या अंबेदरे (जाधववाडी-धनवडेवाडी) स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याकडे असलेल्या झुडपांच्या फांद्या रस्त्यावर आल्यामुळे व रस्ता अरुंद असल्यामुळे पार्थिव स्मशानभूमीकडे नेताना खांदेकऱ्यांना आधार शोधावा लागत आहे. पावसाळ्यात या पाणंद रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी, गुडघाभर चिखल, भातखाचरे, पायवाट यामुळे अक्षरश: कसरत करत पार्थिव स्मशानभूमीकडे न्यावे लागते. सातारा शहरापासून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर अंबेदरे (दरे बुद्रुक) हे गाव आहे. हे गाव जाधववाडी, धनवडेवाडी, मोरेवाडी, भोसलेवाडी, आवाडवाडी, मस्करवाडी, निकमवाडी अशा वाड्या-वस्त्यांचे मिळून आहे व दोन ग्रामपंचायतींत विभागले आहे. त्यामुळे प्रत्येक वाडीनिहाय वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. या सर्व स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताही नाही व खासगी जागेत अंत्यविधी केले जातात. जाधववाडी व धनवडेवाडी येथे गेल्या वर्षी नवीन स्मशानभूमीचे बांधकाम झाले; परंतु या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अजूनही पाणंद रस्ता व पायवाटेचाच वापर करावा लागत आहे. पावसाळ्यात या पाणंद रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याने भरलेले खड्डे व गुडघाभर चिखल असतो व दोन्ही बाजूंच्या झुडपांच्या फांद्या रस्त्यात आल्यामुळे पार्थिवाला आधार देतानाच खांदेकऱ्यांनाही आधार शोधावा लागतो. त्यातच या स्मशानभूमीकडे चारचाकी अथवा दुचाकी गाडी जात नसल्याने अत्यंसंस्कार करण्यासाठी लागणारे साहित्यही ग्रामस्थांना डोक्यावर न्यावे लागते. उन्हाळ्यात ओढा आटल्याने व स्मशानभूमीत पाण्याची पर्यायी सोय नसल्यामुळे ग्रामस्थांना विहिरी किंवा इतरत्र जाऊन पाणी आणावे लागते. स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पावसाळ्यात त्रेधातिरपीट...स्मशानभूमीमध्ये वीज, पाणी, नातेवाइकांना उभे राहण्यासाठी निवारा या सुविधा नसल्यामुळे पावसाळ्यात त्रेधातिरपीट उडते. रात्रीच्या वेळी कंदील, बॅटरी, गॅसबत्तीच्या उजेडात रस्ता शोधावा लागतो. स्मशानभूमीकडे चारचाकी वाहन जात नसल्याने विधीसाठी लागणारे साहित्य डोक्यावरून न्यावे लागते. पाण्याची सोय नसल्याने याठिकाणी कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी, अशी मागणी होत आहे.