शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

घाई असेल तर वाई विसरा!

By admin | Updated: October 29, 2014 00:21 IST

सततची वाहतूक कोंडी : स्थानिक नागरिकांसह भाविक, पर्यटकांना मनस्ताप

पांडुरंग भिलारे-वाई  -तीर्थस्थळ, पर्यटनस्थळ, चित्रीकरणस्थळ अशा बहुविध पैलूंनी नटलेले वाई शहर राज्यभरात नावारूपाला येत आहे. मात्र, रस्ते तेवढेच राहिल्याने शहर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली असून, त्यावर तातडीने उपाय योजण्याची गरज बनली आहे. पवित्र कृष्णाकाठ आणि महागणपती मंदिरामुळे तीर्थक्षेत्र अशी वाई शहराची ओळख आहे. महाबळेश्वर, पाचगणी, धोम जलाशय, मेणवली या पर्यटनस्थळी जाणारे रस्ते वाईमधूनच जातात. मांढरदेव हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थानही जवळच असून, या भाविकांनाही वाईमार्गेच जावे लागते. तथापि, शहरातील रस्ते अरुंद असून, पूर्वीचीच रचना कायम राहिल्यामुळे, तसेच शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने आता हे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. ठिकठिकाणी वाहतूक खोळंबल्याचे दृश्य वारंवार दिसू लागले आहे.तालुक्यातून तसेच पाचगणी, महाबळेश्वर येथून नागरिक खरेदीसाठी वाई शहरातच येतात. मात्र वाहतुकीचे कोणतेही नियोजन होत नाही. अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. सामान्यत: आठवडा बाजाराच्या दिवशी, सुट्यांच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. महाबळेश्वर, पाचगणीला सुट्या घालविण्यासाठी पर्यटक प्रचंड संख्येने येऊ लागले आहेत. पाचगणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाजार समिती ते बसस्थानक रस्ता हे कोंडीचे प्रमुख ठिकाण आहे. सोमवारी आठवडा बाजार भरतो. त्या दिवशी गंगापुरी शाहीर चौक ते किसन वीर चौक या रस्त्यावरील प्रत्येक चौकात कोंडी होते. ग्रामीण रुग्णालय परिसर, पोस्ट आॅफीस परिसर या भागात तर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक, पर्यटक, भाविकांचा वेळ वाया जातो आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रशासनाने वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. वाहतुकीची कोंडी हा नित्याचाच विषय झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना व शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने ठोस उपाययोजना करून ही समस्या सोडवावी.- सतीश जेबले, संस्थाचालक, वाईशनिवार-रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे प्रवाशांना, स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यावर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना व पर्यटकांना दिलासा द्यावा.- सुहास पाटणे, व्यावसायिक, वाई