शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

हिम्मत असेल तर गड राखून दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:48 IST

खटाव/पुसेगाव : ‘सामान्य माणसाच्या अडचणी जाणून भाजपा सरकारने काम करण्यास सुरुवात केल्यामुळे विरोधकांची आता झोप उडाली आहे. कोरेगाव, माण, खटाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिणमध्ये होत असलेले बदल पाहून हे गड आता गेले, याची भीती लागल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. आता मात्र आम्ही उघड आव्हान देतो. हिम्मत असेल तर गड ...

खटाव/पुसेगाव : ‘सामान्य माणसाच्या अडचणी जाणून भाजपा सरकारने काम करण्यास सुरुवात केल्यामुळे विरोधकांची आता झोप उडाली आहे. कोरेगाव, माण, खटाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिणमध्ये होत असलेले बदल पाहून हे गड आता गेले, याची भीती लागल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. आता मात्र आम्ही उघड आव्हान देतो. हिम्मत असेल तर गड सुरक्षित राखा,’ असे आव्हान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.खटाव येथे गौरीशंकर कॉलेजच्या मैदानावर गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शेतकरी मेळावा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत अमळकर, महेश शिंदे, अनिल देसाई, माजी आमदार दिलीप येळगावकर, खटावच्या सरपंच रत्नप्रभा घाडगे, राहुल पाटील, पंचायत समिती सदस्या नीलादेवी जाधव, डॉ. अरुणा बर्गे, पुसेगावच्या सरपंच हेमा गोरे, अनिरुद्ध जगताप, मदन जगताप, भरत मुळे, रणधीर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘पश्चिम भागात पाऊस आहे तर पूर्व भागात पाऊस नाही. अशा गावांना पाणी देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. जिहे कटापूर योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू दिवगंत ‘लक्ष्मणराव इनामदार जलसंयोजना’ हे नाव देण्यात आले आहे.’कटगुण ग्रामपंचायतींच्या नूतन सरपंच जयश्री गोरे व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल देसाई, शेखर चरेगावकर, सदाशिव खाडे यांची भाषणे झाली.महेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संदीप शिंदे व शहाजी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. भरत मुळे यांनी आभार मानले.यावेळी रणधीर जाधव, पंचायत समिती सदस्या निलादेवी जाधव, अभयराजे घाडगे, शिवाजी शेडगे, अ‍ॅड. श्रीनावास मुळे, मनोज नलवडे, संजय नलवडे, डॉ. महेश भिसे, उमेश भिसे, अंकुश पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थित होते.आमदार कोरेगावचा.. राहतो मुंबईत...स्वत:च्या मुलाला कसे पक्षाचे अध्यक्षपद दिले, या विचाराने दुखावल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वत:च्याच पक्षाच्या नेत्याविरोधात एल्गार केला आहे. आमदार कोरेगावचा, राहतो मुंबईमध्ये, कार्यकर्त्यांची गाठ घेतो सहा महिन्यांतून, मुंबईत राहून आमदार म्हणून निवडून देणाऱ्या मतदारांना पाहावयास म्हणून मी खास आलो आहे,’ अशी कोपरखळी यावेळी महाजन यांनी मारली... ते शेतकºयांची व्यथा काय जाणणार?पश्चिम महाराष्ट्रात भाजपाच्या कमळाने आपला रंग दाखवायाला सुरुवात केली आहे. हा बदल पाहून कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडू लागली आहे. माथाडी कामगारांचा नेता शेतकºयांच्या व्यथा काय जाणणार,’ असा घणाघात यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी केला.टंचाई जाहीर करावीमहेश शिंदे यांनी ‘जिहे-कटापूर योजना कोरेगाव-खटावची रक्तवाहिनी आहे. या योजनेमुळे या भागाचा कायापालट होणार आहे. वसना-वांगणा पूर्ण झाली आहे. अद्यापही कोरेगावच्या पूर्व भागात तसेच खटावच्या उत्तर भागात टंचाई आहे. त्यामुळे टंचाई जाहीर करावी,’ अशी मागणी यावेळी महेश शिंदे यांनी केली.