शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

हिम्मत असेल तर गड राखून दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:48 IST

खटाव/पुसेगाव : ‘सामान्य माणसाच्या अडचणी जाणून भाजपा सरकारने काम करण्यास सुरुवात केल्यामुळे विरोधकांची आता झोप उडाली आहे. कोरेगाव, माण, खटाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिणमध्ये होत असलेले बदल पाहून हे गड आता गेले, याची भीती लागल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. आता मात्र आम्ही उघड आव्हान देतो. हिम्मत असेल तर गड ...

खटाव/पुसेगाव : ‘सामान्य माणसाच्या अडचणी जाणून भाजपा सरकारने काम करण्यास सुरुवात केल्यामुळे विरोधकांची आता झोप उडाली आहे. कोरेगाव, माण, खटाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिणमध्ये होत असलेले बदल पाहून हे गड आता गेले, याची भीती लागल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. आता मात्र आम्ही उघड आव्हान देतो. हिम्मत असेल तर गड सुरक्षित राखा,’ असे आव्हान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.खटाव येथे गौरीशंकर कॉलेजच्या मैदानावर गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शेतकरी मेळावा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत अमळकर, महेश शिंदे, अनिल देसाई, माजी आमदार दिलीप येळगावकर, खटावच्या सरपंच रत्नप्रभा घाडगे, राहुल पाटील, पंचायत समिती सदस्या नीलादेवी जाधव, डॉ. अरुणा बर्गे, पुसेगावच्या सरपंच हेमा गोरे, अनिरुद्ध जगताप, मदन जगताप, भरत मुळे, रणधीर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘पश्चिम भागात पाऊस आहे तर पूर्व भागात पाऊस नाही. अशा गावांना पाणी देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. जिहे कटापूर योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू दिवगंत ‘लक्ष्मणराव इनामदार जलसंयोजना’ हे नाव देण्यात आले आहे.’कटगुण ग्रामपंचायतींच्या नूतन सरपंच जयश्री गोरे व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल देसाई, शेखर चरेगावकर, सदाशिव खाडे यांची भाषणे झाली.महेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संदीप शिंदे व शहाजी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. भरत मुळे यांनी आभार मानले.यावेळी रणधीर जाधव, पंचायत समिती सदस्या निलादेवी जाधव, अभयराजे घाडगे, शिवाजी शेडगे, अ‍ॅड. श्रीनावास मुळे, मनोज नलवडे, संजय नलवडे, डॉ. महेश भिसे, उमेश भिसे, अंकुश पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थित होते.आमदार कोरेगावचा.. राहतो मुंबईत...स्वत:च्या मुलाला कसे पक्षाचे अध्यक्षपद दिले, या विचाराने दुखावल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वत:च्याच पक्षाच्या नेत्याविरोधात एल्गार केला आहे. आमदार कोरेगावचा, राहतो मुंबईमध्ये, कार्यकर्त्यांची गाठ घेतो सहा महिन्यांतून, मुंबईत राहून आमदार म्हणून निवडून देणाऱ्या मतदारांना पाहावयास म्हणून मी खास आलो आहे,’ अशी कोपरखळी यावेळी महाजन यांनी मारली... ते शेतकºयांची व्यथा काय जाणणार?पश्चिम महाराष्ट्रात भाजपाच्या कमळाने आपला रंग दाखवायाला सुरुवात केली आहे. हा बदल पाहून कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडू लागली आहे. माथाडी कामगारांचा नेता शेतकºयांच्या व्यथा काय जाणणार,’ असा घणाघात यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी केला.टंचाई जाहीर करावीमहेश शिंदे यांनी ‘जिहे-कटापूर योजना कोरेगाव-खटावची रक्तवाहिनी आहे. या योजनेमुळे या भागाचा कायापालट होणार आहे. वसना-वांगणा पूर्ण झाली आहे. अद्यापही कोरेगावच्या पूर्व भागात तसेच खटावच्या उत्तर भागात टंचाई आहे. त्यामुळे टंचाई जाहीर करावी,’ अशी मागणी यावेळी महेश शिंदे यांनी केली.