शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रोजगारच नसल्यानं मुंबईत राबावं लागतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:48 IST

सातारा ते मेढा 29 किमी लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव : जिल्ह्यात मोठे उद्योगधंदेच नाहीत. एकाही तालुक्यात सक्षम उद्योग नाही. ...

सातारा ते मेढा29 किमीलोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : जिल्ह्यात मोठे उद्योगधंदेच नाहीत. एकाही तालुक्यात सक्षम उद्योग नाही. इतर तालुक्यात शेती व्यवसायासाठी पुरेशा सुविधा तरी आहेत. मात्र जावळीत तशी परिस्थिती नाही, त्यामुळे जावळीकरांच्या नशिबी मुबंईत जाऊन माथाडीतच राबावं लागतं. त्यामुळे नेमका विकास काय झाला, यावर सातारा-मेढा प्रवासात खुमासदार चर्चा रंगली होती.जावळी तालुक्याला उपयोगी पडणारे महू-हातगेघर धरण १९९५ ला सुरू झाले. मात्र वीस वर्षे होऊनही धरण अर्धवट आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न अर्धवट आहे. धरण पूर्ण झालं तर पुढील पिढीची तरी माथाडीमधील ओझ्यातून सुटका होईल, अशी अपेक्षा जावळीकरांना वाटते; पण याकडे कोणता लोकप्रतिनिधी लक्ष देईल, असे दिसत नाही.जावळी तालुक्यातील युवकांना आजही महाविद्यालयीन शिक्षणासाठी सातारा शहरात यावे लागते. जिल्ह्याच्या ठिकाणापासून मेढा जवळ असूनही इथं एकही अभियांत्रिकीचे महाविद्यालय नाही. पदवीपर्यंतच उत्तम शिक्षण देणारे कॉलेज नाही, त्यामुळे चांगल्या शिक्षणासाठी बाहेरच जावं लागतं. अशी खंत साताऱ्यातील कॉलेज संपल्यानंतर घरी परतत असलेल्या तरुणांनी ‘लोकमत आॅन व्हील’मध्ये बोलताना व्यक्त केली.राष्ट्रीय की स्थानिक मुद्दा?अतिपर्जन्यवृष्टीच्या जावळी तालुक्यात अनेक गावे ऐन उन्हाळ्यात तहानलेली असतात. केळघर विभागातील अनेक गावांना उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो.कोण निवडून आले काय आणि कोणाचं सरकार आले तरी डोक्यावरील पाण्याचा हंडा काय उतरला जाणार नाही, अशी खंत महिलेने प्रवासात व्यक्त केली.