शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

रोजगारच नसल्यानं मुंबईत राबावं लागतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:48 IST

सातारा ते मेढा 29 किमी लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव : जिल्ह्यात मोठे उद्योगधंदेच नाहीत. एकाही तालुक्यात सक्षम उद्योग नाही. ...

सातारा ते मेढा29 किमीलोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : जिल्ह्यात मोठे उद्योगधंदेच नाहीत. एकाही तालुक्यात सक्षम उद्योग नाही. इतर तालुक्यात शेती व्यवसायासाठी पुरेशा सुविधा तरी आहेत. मात्र जावळीत तशी परिस्थिती नाही, त्यामुळे जावळीकरांच्या नशिबी मुबंईत जाऊन माथाडीतच राबावं लागतं. त्यामुळे नेमका विकास काय झाला, यावर सातारा-मेढा प्रवासात खुमासदार चर्चा रंगली होती.जावळी तालुक्याला उपयोगी पडणारे महू-हातगेघर धरण १९९५ ला सुरू झाले. मात्र वीस वर्षे होऊनही धरण अर्धवट आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न अर्धवट आहे. धरण पूर्ण झालं तर पुढील पिढीची तरी माथाडीमधील ओझ्यातून सुटका होईल, अशी अपेक्षा जावळीकरांना वाटते; पण याकडे कोणता लोकप्रतिनिधी लक्ष देईल, असे दिसत नाही.जावळी तालुक्यातील युवकांना आजही महाविद्यालयीन शिक्षणासाठी सातारा शहरात यावे लागते. जिल्ह्याच्या ठिकाणापासून मेढा जवळ असूनही इथं एकही अभियांत्रिकीचे महाविद्यालय नाही. पदवीपर्यंतच उत्तम शिक्षण देणारे कॉलेज नाही, त्यामुळे चांगल्या शिक्षणासाठी बाहेरच जावं लागतं. अशी खंत साताऱ्यातील कॉलेज संपल्यानंतर घरी परतत असलेल्या तरुणांनी ‘लोकमत आॅन व्हील’मध्ये बोलताना व्यक्त केली.राष्ट्रीय की स्थानिक मुद्दा?अतिपर्जन्यवृष्टीच्या जावळी तालुक्यात अनेक गावे ऐन उन्हाळ्यात तहानलेली असतात. केळघर विभागातील अनेक गावांना उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो.कोण निवडून आले काय आणि कोणाचं सरकार आले तरी डोक्यावरील पाण्याचा हंडा काय उतरला जाणार नाही, अशी खंत महिलेने प्रवासात व्यक्त केली.