शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

एकरकमी एफआरपी न मिळाल्यास राज्यभर आंदोलन

By admin | Updated: October 2, 2015 23:33 IST

राजू शेट्टी : ठोस पावले न उचलल्यास कोणालाही दिवाळी गोड लागू देणार नाही

सातारा : ‘तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा घाट घातला जात आहे. वार्षिक सभेत ऐनवेळी विषय घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी राज्यभरातील शेतकरी अर्ज करून ते अर्ज शासनाला मोर्चा काढून देणार आहोत, याची सुरुवात दि. १६ रोजी कोल्हापूर येथे साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चाने होणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरातही हे आंदोलन सुरू राहणार आहे. दरम्यान, सरकारने याबाबत ठोस पावले उचलली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू. कोणाला यंदा दिवाळी खाऊ देणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. खासदार राजू शेट्टी शुक्रवारी साताऱ्यात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, ‘जिल्हा बँका या राजकारणांचा अड्डा बनत असून, पूर्वीच्या सरकारने आमच्या विरोधात सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहेत. पुढील वर्षी उसाचा हंगाम सुरू होईल. त्या हंगामात साखर कारखानदारांनी तीन टप्प्यांत एफआरपी रक्कम देण्याचा विषय वार्षिक सभेत घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो तेव्हा खरे वास्तव समजले, असे काहीच झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. जे कारखाने एकरकमी एफआरपी देणार नाहीत. त्यांच्यावर शुगरकेन कंट्रोल १९६६ नुसार कारवाई केली पाहिजे, जे कारखाने एफआरपी देत नाहीत. त्या कारखान्यांच्या संचालक मंडळावर कारवाई करावी, असा शासनाकडे आग्रह धरणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेत आहोत. ज्या कारखान्याबरोबर करार केला आहे. त्या कारखान्याने एफआरपीप्रमाणे दर द्यावा, हे अर्ज गोळा करून १६ आॅक्टोबरला कोल्हापुरात साखर आयुक्तांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. असा इशाराही खा. शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)