शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी एफआरपी न मिळाल्यास राज्यभर आंदोलन

By admin | Updated: October 2, 2015 23:33 IST

राजू शेट्टी : ठोस पावले न उचलल्यास कोणालाही दिवाळी गोड लागू देणार नाही

सातारा : ‘तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा घाट घातला जात आहे. वार्षिक सभेत ऐनवेळी विषय घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी राज्यभरातील शेतकरी अर्ज करून ते अर्ज शासनाला मोर्चा काढून देणार आहोत, याची सुरुवात दि. १६ रोजी कोल्हापूर येथे साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चाने होणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरातही हे आंदोलन सुरू राहणार आहे. दरम्यान, सरकारने याबाबत ठोस पावले उचलली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू. कोणाला यंदा दिवाळी खाऊ देणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. खासदार राजू शेट्टी शुक्रवारी साताऱ्यात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, ‘जिल्हा बँका या राजकारणांचा अड्डा बनत असून, पूर्वीच्या सरकारने आमच्या विरोधात सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहेत. पुढील वर्षी उसाचा हंगाम सुरू होईल. त्या हंगामात साखर कारखानदारांनी तीन टप्प्यांत एफआरपी रक्कम देण्याचा विषय वार्षिक सभेत घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो तेव्हा खरे वास्तव समजले, असे काहीच झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. जे कारखाने एकरकमी एफआरपी देणार नाहीत. त्यांच्यावर शुगरकेन कंट्रोल १९६६ नुसार कारवाई केली पाहिजे, जे कारखाने एफआरपी देत नाहीत. त्या कारखान्यांच्या संचालक मंडळावर कारवाई करावी, असा शासनाकडे आग्रह धरणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेत आहोत. ज्या कारखान्याबरोबर करार केला आहे. त्या कारखान्याने एफआरपीप्रमाणे दर द्यावा, हे अर्ज गोळा करून १६ आॅक्टोबरला कोल्हापुरात साखर आयुक्तांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. असा इशाराही खा. शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)