शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

टेंभू धरणबाधितांना मोबदला न दिल्यास शेतकरी जलसमाधी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST

कऱ्हाड : रयत क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी गोवारे, सैदापूर येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...

कऱ्हाड : रयत क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी गोवारे, सैदापूर येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसांत टेंभू धरणाच्या पाण्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास धरणात जलसमाधी घेण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवड़े यांनी यात पुढाकार घेतला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा नदीवर टेंभू येथे २००८ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. नदीवर धरण बांधण्यात आल्याने गोवारे, सैदापूर, मलकापूर या गावांतील शेतकऱ्यांची नदीकाठची जमीन गेल्या बारा वर्षांपासून पाण्याखाली गेली आहे. गेल्या बारा वर्षांपासून जमीन धरणाच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

धरणाची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेकवेळा या शेतकऱ्यांनी टेंभू जलसिंचन विभागाला अर्ज, निवेदने दिली आहेत. परंतु येथील अधिकाऱ्यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवून दुर्लक्ष केले आहे. गोवारे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी २०१७ मध्ये वर्तमानपत्रामध्ये कृष्णा खोरे महामंडळाने खरेदीपूर्व नोटीस दिली होती. तरीही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण केली नाही.

धरणबाधित शेतकऱ्यांनी, एक तर आमची धरणाच्या पाण्यात गेलेली जमीन तरी परत दया, अन्यथा मोबदला तरी दया, अशी मागणी केली असून, यासंदर्भात येत्या सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास सहकुटुंब टेंभू धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवड़े, राजेंद्र पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पवार, प्रफुल्ल कांबळे, शीतल पवार व गोवारे, सैदापूर येथील शेतकरी उपस्थित होते.

फोटो