शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

टेंभू धरणबाधितांना मोबदला न दिल्यास शेतकरी जलसमाधी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST

कऱ्हाड : रयत क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी गोवारे, सैदापूर येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...

कऱ्हाड : रयत क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी गोवारे, सैदापूर येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसांत टेंभू धरणाच्या पाण्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास धरणात जलसमाधी घेण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवड़े यांनी यात पुढाकार घेतला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा नदीवर टेंभू येथे २००८ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. नदीवर धरण बांधण्यात आल्याने गोवारे, सैदापूर, मलकापूर या गावांतील शेतकऱ्यांची नदीकाठची जमीन गेल्या बारा वर्षांपासून पाण्याखाली गेली आहे. गेल्या बारा वर्षांपासून जमीन धरणाच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

धरणाची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेकवेळा या शेतकऱ्यांनी टेंभू जलसिंचन विभागाला अर्ज, निवेदने दिली आहेत. परंतु येथील अधिकाऱ्यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवून दुर्लक्ष केले आहे. गोवारे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी २०१७ मध्ये वर्तमानपत्रामध्ये कृष्णा खोरे महामंडळाने खरेदीपूर्व नोटीस दिली होती. तरीही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण केली नाही.

धरणबाधित शेतकऱ्यांनी, एक तर आमची धरणाच्या पाण्यात गेलेली जमीन तरी परत दया, अन्यथा मोबदला तरी दया, अशी मागणी केली असून, यासंदर्भात येत्या सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास सहकुटुंब टेंभू धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवड़े, राजेंद्र पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पवार, प्रफुल्ल कांबळे, शीतल पवार व गोवारे, सैदापूर येथील शेतकरी उपस्थित होते.

फोटो