शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

रांगा लागल्यास टोल न घेता वाहने सोडा

By admin | Updated: December 3, 2015 23:50 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश : महामार्ग सहापदरीकरण कामकाज बैठकीत ‘रिलायन्स’ला धरले धारेवराा

जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश : महामार्ग सहापदरीकरण कामकाज बैठकीत ‘रिलायन्स’ला धरले धारेवराारा : टोलविषयी जनतेत मोठा रोष आहे. मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या रांगा टोल व्यवस्थापनाने बंद होण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशा सक्त सूचना देतानाच केलेल्या उपाययोजना तपासण्यासाठी विशेष पथकाच्या निर्मितीचे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या सहापदरीकरण कामकाजाबाबत जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अमृत नाटेकर, वाईचे प्रांताधिकारी अस्मिता मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एस. डी. पोतदार आदी उपस्थित होते.आनेवाडी टोलवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. यामधून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत हा विषय आपण गांभीर्याने घ्यावा, नाहीतर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव करून दिली. ‘केलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी, असे सांगितले. यावर रिलायन्सचे एस. बी. सिंग आम्ही काळजी घेत असल्याचे म्हणाले. मुदगल म्हणाले, ‘आपण खोटे बोलत आहात. १० सेकंदामध्ये वाहन पुढे गेले पाहिजे. रस्त्याच्या कामाबाबत असणारे अडथळेही दूर करुन दिले आहे. येणाऱ्या काळात अतिरिक्त वाहतुकीचे योग्य नियोजन करावे.’नाटेकर म्हणाले, ‘शिवराज पेट्रोल पंप, वाढेफाटा, पाचवड, भुईंज, लोणंद फाटा या चार ठिकाणी पुलाच्या बांधकामाचे काम लवकरच सुरु होणार आहे, तर खिंडवाडी आनेवाडी, उडतारे, बोपेगाव, जोशी विहीर, सुरुर या ठिकाणच्या पुलांवरुन ३१ डिसेंबरपूर्वी वाहतूक सुरु होईल. आवश्यक त्या ठिकाणी असणारे अडथळे पोलीस बंदोबस्तात दूर करण्यात येतील.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. वाघमारे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे संभाजी गावडे, पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, अनुपम कुमार, प्रकल्प समनवयक बी. के. सिंग, राजकुमार कटारिया आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)...तर टोलवसुली नकोटोलवरील असणारी मुले नाहक त्रास देतात. त्यांच्याकडून सौजन्यपूर्ण वागणूक दिली गेली पाहिजे. आपण कोणत्या उपाययोजना करत आहात, याबाबत तपासणीसाठी एक पथक निर्माण करण्यात येईल व या पथकाकडून नियंत्रण ठेवण्यात येईल. रांगा लागल्या तर त्यांच्याकडून टोल वसुली न करता पुढे सोडावे व वाहतुकीची कोंडी मोकळी करावी, असेही जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले. मदत पुरवूनही कामात कुचराई : अभिनव देशमुखडॉ. अभिनव देशमुख म्हणाले, ‘आवश्यक त्यावेळी आणि त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा देण्यात येते. परंतु आपल्याकडून कामात कुचराई केली जाते. अनेक ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी अत्यंत अरुंद मार्ग आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आणि अतिशय उंच असे स्पीडब्रेकर निर्मिती केली आहे. वळणाच्या ठिकाणी फलक लावावेत. रेडियम लावावे. पुलाच्या ठिकाणी रेडियम आणि रिफ्लेक्टर लावावेत. याचा आढावा वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन शाखेने घ्यावा.