शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

तब्येत बरी नसेल तर शाळेत पाठवू नका..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:59 IST

सातारा : तब्येत बरी नसेल तर पाल्याला शाळेत पाठवू नका. पूर्ण बरं वाटल्यावरच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, अशी नोटीस शहरातील बहुतांश शाळांच्या सूचना फलकांवर झळकल्या. स्वाईन फ्लूबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी असा निर्णय घेतला आहे.सातारा शहरातील सर्वच शाळांमध्ये गेल्या काही दिवसांत संसर्गजन्य आजाराने विद्यार्थी त्रस्त आहेत. अभ्यास बुडेल, ...

सातारा : तब्येत बरी नसेल तर पाल्याला शाळेत पाठवू नका. पूर्ण बरं वाटल्यावरच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, अशी नोटीस शहरातील बहुतांश शाळांच्या सूचना फलकांवर झळकल्या. स्वाईन फ्लूबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी असा निर्णय घेतला आहे.सातारा शहरातील सर्वच शाळांमध्ये गेल्या काही दिवसांत संसर्गजन्य आजाराने विद्यार्थी त्रस्त आहेत. अभ्यास बुडेल, या भीतीने पालक सक्तीने आजारी असलेल्या पाल्याला शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे वर्गातील इतर विद्यार्थ्यांनाही संसर्ग झाला आहे. सर्दी आणि तापाने त्रस्त असलेले अनेक विद्यार्थी सक्तीने शाळांमध्ये आल्यामुळे याचा संसर्ग शाळास्तरावर मोठ्या प्रमाणातझाला.सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत स्वाईन फ्लूसदृश्य रुग्ण आढळल्याने शासकीय पातळीवरही याबाबत मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रुमालात किंवा खिशात कापूर ठेवण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत; पण गणेशोत्सव काळात रस्त्यांवर आणि देखावा पाहण्यासाठी उसळलेल्या गर्दीतूनही या संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शाळेत याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला.साताऱ्यातील निवासी शाळा असलेल्या सैनिक स्कूलमध्येही स्वाईन फ्लूसदृश्य रुग्ण आढळल्याने अन्य मुलांना त्याची बाधा होऊ नये म्हणून शाळेला सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य शाळांमधील पालकांची पाचावर धारण बसली होती. विद्यार्थ्यांना आजारपणाच्या कारणाने सुटी घेऊन घरी ठेवले तर वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी मोठा खटाटोप करावा लागतो. त्यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या आजाराने विद्यार्थी त्रस्त असताना शाळेत पाठविण्याची मानसिकता पालकांची राहते.याबाबत काही पालकांनी शाळा व्यवस्थापनाशी संवाद साधला. त्यावेळी ‘संसर्गजन्य आजाराने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय पुन्हा शाळेत हजर होता येईल,’ असा निर्वाळा देण्यात आला.निवडक पालकांबरोबर झालेली ही चर्चा शुक्रवारी शाळेच्या सूचना फलकावरही झळकली.त्यामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, शाळेत बुडलेला अभ्यास पालकांनी पाल्याकडून करून घेणं आणि त्यात काही शंका वाटल्यास वर्गात शिक्षकांना विचारण्याची मुभा शाळा व्यवस्थापनाने दिली आहे.शाळेत लागलेल्या सूचना फलकामुळे अनेक पालक आणि विद्यार्थीवाहतूक करणाºया वाहनचालकांनी याबाबत परस्परांना माहितीदिली. आजारी विद्यार्थी न नेण्याचाही निर्णय वाहनचालकांनी केलाआहे.दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढतीच!गणेशोत्सवाच्या आधीपासून शहरात आलेल्या सर्दी, ताप आणि खोकला या आजारांच्या संसर्गाने सातारकर हैराण झाले आहेत. अनेक बाल रुग्णालयांमध्ये तर सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक घरांमध्ये चिमुकल्यांसह ज्येष्ठांनाही या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे घराघरांमध्ये एखादा रुग्ण अगदी सहज सापडत आहे. घरगुती उपायाबरोबरच औषधांचा मारा सुरू असल्याने रुग्ण वैतागले आहेत. तर रुग्ण सेवा करून पालकही हैराण झाले आहेत. पुढील काही दिवसांत हा संसर्ग कमी होण्याचा कयास वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.वाहनचालकांकडून घेतली जातेय आवश्यक काळजीविद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांमध्ये प्रवास करणाºया मुलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्याचा संसर्ग सहज दुसºयाला होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन वाहनचालकही आपल्या वाहनांमध्ये कापूर आणि नीलगिरीचे तेल ठेवत आहेत. संसर्गित विद्यार्थ्याबरोबरच इतरांनाही याचे वाटप होत आहे. शाळेत जाताना आणि येताना दोन्ही वेळेला याचे वाटप करून वाहनचालक याबाबत आवश्यक ती काळजी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.