शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

तब्येत बरी नसेल तर शाळेत पाठवू नका..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:59 IST

सातारा : तब्येत बरी नसेल तर पाल्याला शाळेत पाठवू नका. पूर्ण बरं वाटल्यावरच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, अशी नोटीस शहरातील बहुतांश शाळांच्या सूचना फलकांवर झळकल्या. स्वाईन फ्लूबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी असा निर्णय घेतला आहे.सातारा शहरातील सर्वच शाळांमध्ये गेल्या काही दिवसांत संसर्गजन्य आजाराने विद्यार्थी त्रस्त आहेत. अभ्यास बुडेल, ...

सातारा : तब्येत बरी नसेल तर पाल्याला शाळेत पाठवू नका. पूर्ण बरं वाटल्यावरच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, अशी नोटीस शहरातील बहुतांश शाळांच्या सूचना फलकांवर झळकल्या. स्वाईन फ्लूबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी असा निर्णय घेतला आहे.सातारा शहरातील सर्वच शाळांमध्ये गेल्या काही दिवसांत संसर्गजन्य आजाराने विद्यार्थी त्रस्त आहेत. अभ्यास बुडेल, या भीतीने पालक सक्तीने आजारी असलेल्या पाल्याला शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे वर्गातील इतर विद्यार्थ्यांनाही संसर्ग झाला आहे. सर्दी आणि तापाने त्रस्त असलेले अनेक विद्यार्थी सक्तीने शाळांमध्ये आल्यामुळे याचा संसर्ग शाळास्तरावर मोठ्या प्रमाणातझाला.सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत स्वाईन फ्लूसदृश्य रुग्ण आढळल्याने शासकीय पातळीवरही याबाबत मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रुमालात किंवा खिशात कापूर ठेवण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत; पण गणेशोत्सव काळात रस्त्यांवर आणि देखावा पाहण्यासाठी उसळलेल्या गर्दीतूनही या संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शाळेत याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला.साताऱ्यातील निवासी शाळा असलेल्या सैनिक स्कूलमध्येही स्वाईन फ्लूसदृश्य रुग्ण आढळल्याने अन्य मुलांना त्याची बाधा होऊ नये म्हणून शाळेला सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य शाळांमधील पालकांची पाचावर धारण बसली होती. विद्यार्थ्यांना आजारपणाच्या कारणाने सुटी घेऊन घरी ठेवले तर वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी मोठा खटाटोप करावा लागतो. त्यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या आजाराने विद्यार्थी त्रस्त असताना शाळेत पाठविण्याची मानसिकता पालकांची राहते.याबाबत काही पालकांनी शाळा व्यवस्थापनाशी संवाद साधला. त्यावेळी ‘संसर्गजन्य आजाराने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय पुन्हा शाळेत हजर होता येईल,’ असा निर्वाळा देण्यात आला.निवडक पालकांबरोबर झालेली ही चर्चा शुक्रवारी शाळेच्या सूचना फलकावरही झळकली.त्यामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, शाळेत बुडलेला अभ्यास पालकांनी पाल्याकडून करून घेणं आणि त्यात काही शंका वाटल्यास वर्गात शिक्षकांना विचारण्याची मुभा शाळा व्यवस्थापनाने दिली आहे.शाळेत लागलेल्या सूचना फलकामुळे अनेक पालक आणि विद्यार्थीवाहतूक करणाºया वाहनचालकांनी याबाबत परस्परांना माहितीदिली. आजारी विद्यार्थी न नेण्याचाही निर्णय वाहनचालकांनी केलाआहे.दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढतीच!गणेशोत्सवाच्या आधीपासून शहरात आलेल्या सर्दी, ताप आणि खोकला या आजारांच्या संसर्गाने सातारकर हैराण झाले आहेत. अनेक बाल रुग्णालयांमध्ये तर सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक घरांमध्ये चिमुकल्यांसह ज्येष्ठांनाही या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे घराघरांमध्ये एखादा रुग्ण अगदी सहज सापडत आहे. घरगुती उपायाबरोबरच औषधांचा मारा सुरू असल्याने रुग्ण वैतागले आहेत. तर रुग्ण सेवा करून पालकही हैराण झाले आहेत. पुढील काही दिवसांत हा संसर्ग कमी होण्याचा कयास वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.वाहनचालकांकडून घेतली जातेय आवश्यक काळजीविद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांमध्ये प्रवास करणाºया मुलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्याचा संसर्ग सहज दुसºयाला होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन वाहनचालकही आपल्या वाहनांमध्ये कापूर आणि नीलगिरीचे तेल ठेवत आहेत. संसर्गित विद्यार्थ्याबरोबरच इतरांनाही याचे वाटप होत आहे. शाळेत जाताना आणि येताना दोन्ही वेळेला याचे वाटप करून वाहनचालक याबाबत आवश्यक ती काळजी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.