शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

तब्येत बरी नसेल तर शाळेत पाठवू नका..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:59 IST

सातारा : तब्येत बरी नसेल तर पाल्याला शाळेत पाठवू नका. पूर्ण बरं वाटल्यावरच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, अशी नोटीस शहरातील बहुतांश शाळांच्या सूचना फलकांवर झळकल्या. स्वाईन फ्लूबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी असा निर्णय घेतला आहे.सातारा शहरातील सर्वच शाळांमध्ये गेल्या काही दिवसांत संसर्गजन्य आजाराने विद्यार्थी त्रस्त आहेत. अभ्यास बुडेल, ...

सातारा : तब्येत बरी नसेल तर पाल्याला शाळेत पाठवू नका. पूर्ण बरं वाटल्यावरच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, अशी नोटीस शहरातील बहुतांश शाळांच्या सूचना फलकांवर झळकल्या. स्वाईन फ्लूबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी असा निर्णय घेतला आहे.सातारा शहरातील सर्वच शाळांमध्ये गेल्या काही दिवसांत संसर्गजन्य आजाराने विद्यार्थी त्रस्त आहेत. अभ्यास बुडेल, या भीतीने पालक सक्तीने आजारी असलेल्या पाल्याला शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे वर्गातील इतर विद्यार्थ्यांनाही संसर्ग झाला आहे. सर्दी आणि तापाने त्रस्त असलेले अनेक विद्यार्थी सक्तीने शाळांमध्ये आल्यामुळे याचा संसर्ग शाळास्तरावर मोठ्या प्रमाणातझाला.सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत स्वाईन फ्लूसदृश्य रुग्ण आढळल्याने शासकीय पातळीवरही याबाबत मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रुमालात किंवा खिशात कापूर ठेवण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत; पण गणेशोत्सव काळात रस्त्यांवर आणि देखावा पाहण्यासाठी उसळलेल्या गर्दीतूनही या संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शाळेत याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला.साताऱ्यातील निवासी शाळा असलेल्या सैनिक स्कूलमध्येही स्वाईन फ्लूसदृश्य रुग्ण आढळल्याने अन्य मुलांना त्याची बाधा होऊ नये म्हणून शाळेला सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य शाळांमधील पालकांची पाचावर धारण बसली होती. विद्यार्थ्यांना आजारपणाच्या कारणाने सुटी घेऊन घरी ठेवले तर वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी मोठा खटाटोप करावा लागतो. त्यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या आजाराने विद्यार्थी त्रस्त असताना शाळेत पाठविण्याची मानसिकता पालकांची राहते.याबाबत काही पालकांनी शाळा व्यवस्थापनाशी संवाद साधला. त्यावेळी ‘संसर्गजन्य आजाराने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय पुन्हा शाळेत हजर होता येईल,’ असा निर्वाळा देण्यात आला.निवडक पालकांबरोबर झालेली ही चर्चा शुक्रवारी शाळेच्या सूचना फलकावरही झळकली.त्यामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, शाळेत बुडलेला अभ्यास पालकांनी पाल्याकडून करून घेणं आणि त्यात काही शंका वाटल्यास वर्गात शिक्षकांना विचारण्याची मुभा शाळा व्यवस्थापनाने दिली आहे.शाळेत लागलेल्या सूचना फलकामुळे अनेक पालक आणि विद्यार्थीवाहतूक करणाºया वाहनचालकांनी याबाबत परस्परांना माहितीदिली. आजारी विद्यार्थी न नेण्याचाही निर्णय वाहनचालकांनी केलाआहे.दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढतीच!गणेशोत्सवाच्या आधीपासून शहरात आलेल्या सर्दी, ताप आणि खोकला या आजारांच्या संसर्गाने सातारकर हैराण झाले आहेत. अनेक बाल रुग्णालयांमध्ये तर सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक घरांमध्ये चिमुकल्यांसह ज्येष्ठांनाही या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे घराघरांमध्ये एखादा रुग्ण अगदी सहज सापडत आहे. घरगुती उपायाबरोबरच औषधांचा मारा सुरू असल्याने रुग्ण वैतागले आहेत. तर रुग्ण सेवा करून पालकही हैराण झाले आहेत. पुढील काही दिवसांत हा संसर्ग कमी होण्याचा कयास वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.वाहनचालकांकडून घेतली जातेय आवश्यक काळजीविद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांमध्ये प्रवास करणाºया मुलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्याचा संसर्ग सहज दुसºयाला होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन वाहनचालकही आपल्या वाहनांमध्ये कापूर आणि नीलगिरीचे तेल ठेवत आहेत. संसर्गित विद्यार्थ्याबरोबरच इतरांनाही याचे वाटप होत आहे. शाळेत जाताना आणि येताना दोन्ही वेळेला याचे वाटप करून वाहनचालक याबाबत आवश्यक ती काळजी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.