शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा न घेतल्यास सरपंचांंवरच संक्रांत ग्रामसेवकांचा बहिष्कार : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा होऊ शकतो भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:24 IST

सातारा : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे. मात्र, ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सभा बोलावण्याचे अधिकार आहेत

सातारा : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे. मात्र, ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सभा बोलावण्याचे अधिकार आहेत. ग्रामसेवक हे सभा सचिव असतात. सभा बोलावली गेली नाही तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९, पोटनियम ३ मधील तरतुदीनुसार ग्रामसभा बैठकी बोलावण्याच्या नियमाचा भंग झाला म्हणून सरपंचांवरच संक्रांत कोसळू शकते.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई-१३६ जिल्हा शाखेतर्फे २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात येऊ नये, असे पत्र जिल्हा परिषदेला दिले आहे. या संदर्भाने संपूर्ण जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. नियमाप्रमाणे वित्तीय वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. मात्र, या सभाच आता घेण्याची गरज नाही, अशा अफवा पसरवल्या गेल्याने बहुतांश गावांमध्ये ग्रामसभा होणार नाही, अशी अफवा पसरली आहे. २६ जानेवारीच्या सभेबाबतही खुद्द सरपंच, उपसरपंच मंडळीही अनभिज्ञ आहेत. सरपंचांनी सभेची नोटीस बजावयाची आहे. ते उपलब्ध नसतील तर तो अधिकार उपसरपंचांना आहे. प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायचे आहे.

दरम्यान, ग्रामसेवक युनियनने ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाºयांना आदेश काढले असून, नियमाप्रमाणे २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. नियमातील तरतूद सर्व ग्रामपंचायती, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणावी. जिल्ह्यामध्ये दिनांक २६ जानेवारी २०१८ रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात यावे, तसेच प्रजासत्ताकदिनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा परिषदेला ईमेलने माहिती द्यावी, अशा सूचना केल्या आहेत.नियम काय सांगतो?प्रत्येक वित्तीय वर्षाच्या सुरुवातीनंतर दोन महिन्यांच्या आत, प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात, आॅगस्ट महिन्यात, २६ जानेवारी रोजी अशा चार ग्रामसभा घेणे नियमानुसार बंधनकारकआहे. 

मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंचांनी वर्षात चार ग्रामसभा बोलावणे बंधनकारक आहे. ग्रामसेवक युनियनने जरी ग्रामसभा न घेण्याचे कळविले असले तरीही इतर शासकीय कर्मचाºयाची सभा सचिव म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार गटविकास अधिकाºयांना आहेत. त्यामुळे सभा घेण्यात कोणतीही अडचण नाही. २६ जानेवारी रोजी सभा घेणे अनिवार्य आहे, अन्यथा सरपंच अडचणीत येऊ शकतात.- डॉ. कैलास शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद