शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा न घेतल्यास सरपंचांंवरच संक्रांत ग्रामसेवकांचा बहिष्कार : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा होऊ शकतो भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:24 IST

सातारा : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे. मात्र, ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सभा बोलावण्याचे अधिकार आहेत

सातारा : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे. मात्र, ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सभा बोलावण्याचे अधिकार आहेत. ग्रामसेवक हे सभा सचिव असतात. सभा बोलावली गेली नाही तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९, पोटनियम ३ मधील तरतुदीनुसार ग्रामसभा बैठकी बोलावण्याच्या नियमाचा भंग झाला म्हणून सरपंचांवरच संक्रांत कोसळू शकते.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई-१३६ जिल्हा शाखेतर्फे २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात येऊ नये, असे पत्र जिल्हा परिषदेला दिले आहे. या संदर्भाने संपूर्ण जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. नियमाप्रमाणे वित्तीय वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. मात्र, या सभाच आता घेण्याची गरज नाही, अशा अफवा पसरवल्या गेल्याने बहुतांश गावांमध्ये ग्रामसभा होणार नाही, अशी अफवा पसरली आहे. २६ जानेवारीच्या सभेबाबतही खुद्द सरपंच, उपसरपंच मंडळीही अनभिज्ञ आहेत. सरपंचांनी सभेची नोटीस बजावयाची आहे. ते उपलब्ध नसतील तर तो अधिकार उपसरपंचांना आहे. प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायचे आहे.

दरम्यान, ग्रामसेवक युनियनने ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाºयांना आदेश काढले असून, नियमाप्रमाणे २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. नियमातील तरतूद सर्व ग्रामपंचायती, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणावी. जिल्ह्यामध्ये दिनांक २६ जानेवारी २०१८ रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात यावे, तसेच प्रजासत्ताकदिनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा परिषदेला ईमेलने माहिती द्यावी, अशा सूचना केल्या आहेत.नियम काय सांगतो?प्रत्येक वित्तीय वर्षाच्या सुरुवातीनंतर दोन महिन्यांच्या आत, प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात, आॅगस्ट महिन्यात, २६ जानेवारी रोजी अशा चार ग्रामसभा घेणे नियमानुसार बंधनकारकआहे. 

मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंचांनी वर्षात चार ग्रामसभा बोलावणे बंधनकारक आहे. ग्रामसेवक युनियनने जरी ग्रामसभा न घेण्याचे कळविले असले तरीही इतर शासकीय कर्मचाºयाची सभा सचिव म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार गटविकास अधिकाºयांना आहेत. त्यामुळे सभा घेण्यात कोणतीही अडचण नाही. २६ जानेवारी रोजी सभा घेणे अनिवार्य आहे, अन्यथा सरपंच अडचणीत येऊ शकतात.- डॉ. कैलास शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद