शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

संविधान बदलल्यास सत्यानाश!

By admin | Updated: April 17, 2016 23:27 IST

रामदास आठवले : गांधी मैदानावरील सभेत इशारा; राज्यातील शिवसेना-भाजपचे सरकार दलितांच्या मतामुळेच...

सातारा : ‘धर्म, भाषा यावर तुटत चाललेला भारत अखंड ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे खासदार रामदास आठले यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी दलित समाजाच्या मतामुळेच राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आल्याचे ठामपणे सांगितले. दि. २६ जानेवारीपासून ‘जाती तोडो, समाज जोडो’ या अभियानांतर्गत कन्याकुमारी येथून ‘भारत भीमरथ’ची सुरुवात झाली आहे. हा रथ शनिवारी रात्री साताऱ्यात आला होता. त्यावेळी गांधी मैदानावर आयोजित सभेत खासदार आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘रिपाइं’चे राज्य उपाध्यक्ष किशोर तपासे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ‘रिपाइं’च्या कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड, अण्णा वायदंडे, सतीश गायकवाड, अप्पा तुपे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार आठवले म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती देशभरात उत्साहात साजरी केली. डॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वांनाच पटलेले आहेत.आता जातिभेद संपविण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. यापुढे समतावादी भारत निर्माण करायचा असून, त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावा लागणार आहे. राज्यातील मराठा व मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवे, अशी आमची भूमिका आहे,’ असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. किशोर तपासे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ‘रिपाइं’चे कार्यकर्ते उपस्थित होते. शरद गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)सहा महिन्यांत गाव तिथे शाखा...या कार्यक्रमात अशोक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. आगामी सहा महिन्यांत ‘गाव तेथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता’ असणार आहे. ही भूमिका घेऊनच बाहेर पडणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्यातील पक्षाची जबाबदारी खांद्यावर आहे. त्यामुळे सर्व स्तरातील लोक पक्षाशी जोडले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.