शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

संविधान बदलल्यास सत्यानाश!

By admin | Updated: April 19, 2016 01:04 IST

रामदास आठवले : गांधी मैदानावरील सभेत इशारा; राज्यातील शिवसेना-भाजपचे सरकार दलितांच्या मतामुळेच...

सातारा : ‘धर्म, भाषा यावर तुटत चाललेला भारत अखंड ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे खासदार रामदास आठले यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी दलित समाजाच्या मतामुळेच राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आल्याचे ठामपणे सांगितले. दि. २६ जानेवारीपासून ‘जाती तोडो, समाज जोडो’ या अभियानांतर्गत कन्याकुमारी येथून ‘भारत भीमरथ’ची सुरुवात झाली आहे. हा रथ शनिवारी रात्री साताऱ्यात आला होता. त्यावेळी गांधी मैदानावर आयोजित सभेत खासदार आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘रिपाइं’चे राज्य उपाध्यक्ष किशोर तपासे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ‘रिपाइं’च्या कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड, अण्णा वायदंडे, सतीश गायकवाड, अप्पा तुपे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार आठवले म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती देशभरात उत्साहात साजरी केली. डॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वांनाच पटलेले आहेत.आता जातिभेद संपविण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. यापुढे समतावादी भारत निर्माण करायचा असून, त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावा लागणार आहे. राज्यातील मराठा व मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवे, अशी आमची भूमिका आहे,’ असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. किशोर तपासे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ‘रिपाइं’चे कार्यकर्ते उपस्थित होते. शरद गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)सातारा येथील कार्यक्रमात रामदास आठवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी किशोर तपासे, अशोक गायकवाड, शरद गायकवाड उपस्थित होते.