शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

माणला गतवैभव आणणार !

By admin | Updated: July 15, 2016 22:38 IST

सुभाष नरळे : राष्ट्रवादीने सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिल्याचे सूतोवाच

सातारा : ‘माण तालुक्यात दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांचा एक खांबी तंबू होता. राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी पोळ यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. ते नसते तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जिल्हा पातळीवर कामच करू शकला नसता. ४० वर्षांच्या कालखंडात पोळ तात्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून माण तालुक्यात जे वैभव निर्माण केले होते, ते पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नरळे यांनी गुरुवारी सकाळी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर ‘लोकमत टीम’सोबत त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विकासात्मक अशा विविध विषयांवर चर्चा केली. नरळे म्हणाले, ‘सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे. त्यांची कामे वेगाने झाली पाहिजेत. दुष्काळाशी सामना करणाऱ्या आपल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. या बाबी दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांनी कायम राखल्या. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले. पक्षाविषयी सर्वसामान्यांमध्ये आपुलकीचे वातावरण होते. अजूनही ही आपुलकी आम्ही जपली आहे. तात्यांच्या आदर्शाप्रमाणे काम करत असताना सर्वसामान्यांची अडवणूक होऊ नये, त्यांना दिलासा मिळावा, असे निर्णय घेऊन वेळप्रसंगी कामात त्यांना मदत करण्याचे प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो.’ ‘मागील दहा वर्षांच्या कालखंडात माण तालुक्यात राष्ट्रवादीसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. पिढी बदलली तशा लोकांच्या अपेक्षा बदलल्या. नवीन तरुण मतदार आले. याचा फायदा उठवून विरोधकांनी तालुक्याची सत्ता मिळविली आहे. या बदलत्या काळात तात्यांनी अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तरी देखील दहा वर्षांपूर्वी तालुक्यात नेतृत्व बदल झाला. तात्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला तालुक्यात अवकळा आल्याचे केवळ सांगितले जात आहे. वास्तव परिस्थिती तशी नाही. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आम्ही तुलनेने चांगले आहोत. यात आणखी भर घालण्यासाठी व राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माण तालुक्याला ऊर्जितावस्था आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मंडळींना राष्ट्रवादीने मोठे केले आहे. कोणत्याही वैयक्तिक राजकीय अपेक्षेविना सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रामराजेंनी हा निर्णय घेतला आहे.’प्रतापसिंह हायस्कूल ‘आयडॉल’ बनवू‘शिक्षण, आरोग्य या बाबींना मी महत्त्व देतो. आजच्या घडीला सयाजी हायस्कूल व कल्याणी विद्यालयामध्ये गुणवत्तेशिवाय मुलांना प्रवेश मिळत नाहीत. या परिस्थितीत जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह हायस्कूलही ‘आयडॉल’ बनवू. या हायस्कूलमध्ये सर्वसामान्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल. काही दिवसांतच आमचे हे स्वप्न आम्ही साकार करू,’ असा विश्वासही नरळे यांनी व्यक्त केला. शिवाजीरावांनी थांबायला हवं होतंशिवाजीराव शिंदे हे माझे जवळचे स्नेही आहेत. त्यांना कृषी सभापतिपदाची संधी दिली गेली होती. पक्षाच्या निर्णयानुसार त्यांनी थांबायला हवं होतं. वेळीच राजीनामा दिला असता तर अविश्वास आणण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती.