शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मला साडेतीन लाखांचेच मताधिक्य; उदयनराजेंचा दावा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:59 IST

सातारा : ‘सातारा लोकसभा मतदार संघात आपल्याला खात्रीने साडेतीन लाखांचे मताधिक्य आहे,’ असा दावा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ...

सातारा : ‘सातारा लोकसभा मतदार संघात आपल्याला खात्रीने साडेतीन लाखांचे मताधिक्य आहे,’ असा दावा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. ‘मी राजीनामा देतो पुन्हा फेरमतदान होऊ दे. तितक्याच मताधिक्याने निवडून येईन,’ असा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का ?, असा सवाल उपस्थित केला आहे.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत उदयनराजे यांनी ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे, ती उखडून टाकायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने अधिकाराने या विषयावर भाष्य करायला हवे. मात्र, या विषयावर दाद मागणाºयालाच कारवाईची भाषा वापरली जाते, हे चुकीचे असल्याचे मत खा. उदयनराजे यांनी व्यक्त केले.देशभरातील ३७६ मतदार संघांमध्ये ईव्हीएम मशीनमधील मतांच्या आकडेवारीत घोळ झाला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान व मतमोजणी यांच्यामध्ये चक्क ६७२ मतांचा फरक आहे.ईव्हीएम मशीनच्या वैधतेबाबत कायदेपंडितांनी जी ठामपणे विधाने केली ती कोणत्या आधारावर केली. निवडणूक ही जनतेच्या पैशांवर होते, त्याची उधळपट्टी करण्याचा अधिकार कोणाला नाही. एक हजार मते मोजणाºया एका ईव्हीएम मशीनची किंमत तेहतीस हजार म्हणजे एका मताची किंमत १ रुपया ३० पैसे आणि बॅलेट पेपरने निवडणूक घेतल्यास अवघा तेराशे रुपये खर्च येतो. ईव्हीएम मशीनवर तब्बल ४ हजार ५५५ कोटी रुपये खर्च झाला. जर ईव्हीएम मशीन निर्वेध होत्या, मग सहा विधानसभा मतदार संघात ६७२ मतांचा फरक कसा पडला ? असा सवाल उदयनराजे यांनी केला....मग राजेशाही काय वाईट होती?उदयनराजे कधी रडीचा डाव खेळत नाही, लोकशाहीचा गळा घोटणाºया या यंत्रणेपेक्षा राजेशाही काय वाईट होती ? या प्रकाराला वेळीच पायबंद घातला नाहीतर १८५७ च्या बंडाप्रमाणे सर्वत्र रक्तपात होऊन सारी व्यवस्था नष्ट होईल, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली.