शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मला साडेतीन लाखांचेच मताधिक्य; उदयनराजेंचा दावा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:59 IST

सातारा : ‘सातारा लोकसभा मतदार संघात आपल्याला खात्रीने साडेतीन लाखांचे मताधिक्य आहे,’ असा दावा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ...

सातारा : ‘सातारा लोकसभा मतदार संघात आपल्याला खात्रीने साडेतीन लाखांचे मताधिक्य आहे,’ असा दावा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. ‘मी राजीनामा देतो पुन्हा फेरमतदान होऊ दे. तितक्याच मताधिक्याने निवडून येईन,’ असा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का ?, असा सवाल उपस्थित केला आहे.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत उदयनराजे यांनी ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे, ती उखडून टाकायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने अधिकाराने या विषयावर भाष्य करायला हवे. मात्र, या विषयावर दाद मागणाºयालाच कारवाईची भाषा वापरली जाते, हे चुकीचे असल्याचे मत खा. उदयनराजे यांनी व्यक्त केले.देशभरातील ३७६ मतदार संघांमध्ये ईव्हीएम मशीनमधील मतांच्या आकडेवारीत घोळ झाला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान व मतमोजणी यांच्यामध्ये चक्क ६७२ मतांचा फरक आहे.ईव्हीएम मशीनच्या वैधतेबाबत कायदेपंडितांनी जी ठामपणे विधाने केली ती कोणत्या आधारावर केली. निवडणूक ही जनतेच्या पैशांवर होते, त्याची उधळपट्टी करण्याचा अधिकार कोणाला नाही. एक हजार मते मोजणाºया एका ईव्हीएम मशीनची किंमत तेहतीस हजार म्हणजे एका मताची किंमत १ रुपया ३० पैसे आणि बॅलेट पेपरने निवडणूक घेतल्यास अवघा तेराशे रुपये खर्च येतो. ईव्हीएम मशीनवर तब्बल ४ हजार ५५५ कोटी रुपये खर्च झाला. जर ईव्हीएम मशीन निर्वेध होत्या, मग सहा विधानसभा मतदार संघात ६७२ मतांचा फरक कसा पडला ? असा सवाल उदयनराजे यांनी केला....मग राजेशाही काय वाईट होती?उदयनराजे कधी रडीचा डाव खेळत नाही, लोकशाहीचा गळा घोटणाºया या यंत्रणेपेक्षा राजेशाही काय वाईट होती ? या प्रकाराला वेळीच पायबंद घातला नाहीतर १८५७ च्या बंडाप्रमाणे सर्वत्र रक्तपात होऊन सारी व्यवस्था नष्ट होईल, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली.