कऱ्हाड : सैदापूर, विद्यानगर, गोवारे परिसरातील कार्यकर्त्याशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी थेट नागरिकांशी चर्चा करत संवाद साधला़ सुरूवातीला मुख्यमंत्र्यांचा सत्कार झाला अन ते मार्गदर्शन करतील असे सांगण्यात आले़ त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलले खरे पण त्यांनी सुरूवातीलाच ‘मी बोलायला नव्हे तर तुमचं ऐकायला आलोय, तेव्हा तुम्हीच बोला,’ अशी भावनिक साद घातली़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सैदापूर परिसरातील नागरिकांशी थेट संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता़ त्यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, प्राचार्य मोहन राजमाने उपस्थित होते़ चव्हाण म्हणाले, ‘मी बोलायला नव्हे तर तुमचं ऐकायला आलोय तुम्हीच बोला असे ते म्हणाले़ पण आग्रह वाढल्याने ते बोेलते झाले़ राज्याच्या राजकारणात मी अचानक आलो त्यामुळे इथले राजकारण समजायला खुप वेळ गेला त्यामुळे तुमच्याशी संवाद साधायला उशीर झालाय अशी कबुली त्यांनी सुरूवातीलाच दिली़ आता तुम्ही बोला म्हणत त्यांनी सुमारे दिड तास लोकांशी चर्चा केली़ त्यांची निवेदने स्विकारली़ सैदापूरच्या २४-७ नळपाणी पुरवठा योजनेस होत असलेला विलंब, बाबूराव गोखले वाचनालयाची दुरवस्था, अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरण, खोडशी धरणातील गाळ काढण्याची गरज आदी मागण्यांची निवेदने दिली़ कार्यक्रमाचे आयोजन बाळासो जाधव, शिवाजी जाधव, धनाजी जाधव, आदिंनी केले होते़ (प्रतिनिधी)अनेक ठिकाणी रस्ते होणारसैदापूर येथील कार्यक्रमात नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध कामांसाठी निधीची घोषणा केली़ त्यात गोवारे रस्त्यासाठी १ कोटी, अंतर्गत रस्ते काँक्रटीकरण १ कोटी, एस़जी़एम़ कॉलेज सभागृृहासाठी १ कोटी आदी निधींची घोषणा केली़
मी बोलायला नव्हे तुमचं ऐकायला आलोय !
By admin | Updated: July 19, 2014 23:24 IST