शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

मी भाजपबरोबर? कदापिही नाही!-- सदाभाऊ खोत :

By admin | Updated: January 6, 2017 03:57 IST

‘काय म्हणता... मी भाजपबरोबर? कदापिही शक्य नाही. जे कोण ही चर्चा करीत आहेत, त्यांनाच विचारा, यामागचे कारण काय?

सातारा : ‘काय म्हणता... मी भाजपबरोबर? कदापिही शक्य नाही. जे कोण ही चर्चा करीत आहेत, त्यांनाच विचारा, यामागचे कारण काय? कारण खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर असलेली पंचवीस वर्षांची दोस्ती तुटायची नाही,’ या शब्दांत साताऱ्याचे नूतन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सहपालकमंत्री पद मिळाल्यानंतर गुरुवारी ते प्रथमच साताऱ्यात आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिल्यानंतर बोलत होते. सर्वप्रथम ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी ‘लोकमत टीम’शी संवाद साधला. ‘माझ्या कामाची पद्धत पाहूनच कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आणखी काही खात्यांची जबाबदारी दिली असावी. याचा अर्थ मी लगेच माझा पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार, असा कसा होऊ शकतो? खरेतर विरोधक असल्यापासून माझी फडणवीस यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक विषय विरोधक म्हणून एकत्र येऊन राज्यात गाजविले आहेत. आमची मैत्री केवळ सत्तेपुरती नव्हती अन् राहणार नाही.’मुख्यमंत्र्यांकडून नवीन सूचनांचे स्वागतमी शेतकरी संघटनेत काम करीत असल्याने ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मला चांगली जाण आहे. यासंदर्भात काही सूचना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर माझ्या सूचनांचे त्यांनी नेहमीच स्वागत केले, असेही सांगायला खोत विसरले नाही. सदाभाऊ मोठे झाले तर मला का वाईट वाटावे, ते पक्ष सोडणार नाहीत : शेट्टीकोल्हापूर : राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे चळवळीच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रवाहातून बाजूला जाऊन ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी सुतराम शक्यता नाही. त्यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्व दिले गेले तर त्याचे मला वाईट वाटण्याचे कारणच नाही कारण संघटनेतून त्यांना मंत्री करा, असे मीच सरकारला सुचविले होते असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली असून, सदाभाऊ भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या दोन-तीन दिवस प्रसिद्धी माध्यमांतून चर्चेत आहेत. त्या अनुषंगाने ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, ‘आम्ही दोघेही गेली पंचवीस वर्षे एकत्र चळवळीत काम करीत आहे. सदाभाऊंना मंत्री करावे असे संघटनेतून एकमेव नाव आम्ही सुचविले होते. त्यावेळीही कोणताच वाद नव्हता. मंत्री झाल्यावर सरकारच्या कामाबद्दल जसे चळवळीत आक्रमकपणे बोलता येते तसे बोलता येत नाही, त्यामुळे त्यांची भाषा थोडी नरम झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. मंत्रिमंडळात त्यांचे महत्त्व वाढले तर त्याचे मला वाईट वाटायचे कारण नाही. कारण माझा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. मला चळवळीचा आधार घेऊन सत्तेत जायचे असते तर यापूर्वीच ते करता आले असते. शेतकरी चळवळीचे उत्तरदायित्व माझ्यावर आहे आणि सरकार चुकत असेल तर त्याविरोधात आक्रमकपणे बोलून सरकारला जाग्यावर आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हीच भूमिका मी सध्या पार पाडत आहे. सरकारवर दबाव टाकण्याचे तेवढे एकच अस्त्र आमच्याकडे आहे. कारण आमचा एकही आमदार नाही.’