शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

हनिमुनला जातानाच पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:12 IST

वाई : पसरणी घाटामध्ये पुण्याच्या युवकाचा झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात वाई पोलिसांना यश आले असून, हा खून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी प्रियकर निखिल सुदाम मळेकर (वय २४, रा. चिखली, निगडी, पुणे) व नवविवाहिता दीक्षा आनंद कांबळे (२४, रा. औंध, पुणे) या दोघांना अटक केली असून ...

वाई : पसरणी घाटामध्ये पुण्याच्या युवकाचा झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात वाई पोलिसांना यश आले असून, हा खून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी प्रियकर निखिल सुदाम मळेकर (वय २४, रा. चिखली, निगडी, पुणे) व नवविवाहिता दीक्षा आनंद कांबळे (२४, रा. औंध, पुणे) या दोघांना अटक केली असून पाचजण फरार आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या एका नवविवाहित दाम्पत्यावर पसरणी घाटात शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी आनंद ज्ञानदेव कांबळे (वय ३२ रा. औंध, पुणे) यांच्यावर कोयत्याने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली होती.आनंदने मित्र राजेश बोबडे याच्यासोबत महाबळेश्वरला फिरण्यासाठी जाण्याचे नियोजन केले होते. हे दीक्षाने निखिलला सांगितले. त्यानुसार निखिल एक दिवस अगोदर महाबळेश्वर परिसरात येऊन थांबला होता. शनिवारी सकाळी पुण्याहून आनंद कांबळे व दीक्षा तसेच राजेश बोबडे व त्याची पत्नी कल्याणी असे चौघेजण कारमधून (एमएच १४ जीएक्स ७१७१) महाबळेश्वरला फिरायला निघाले. दरम्यान, दीक्षा मोबाईलद्वारे निखिलच्या संपर्कात होती. त्याने केलेल्या कटाचा भाग म्हणून कार पसरणी घाटात येताच दीक्षाने उलटीचा त्रास झाल्याचे नाटक करून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. आनंद व दीक्षा गाडीतून उतरून थोडे बाजूला उभे राहिले. यावेळी राजेश व कल्याणी संरक्षक कठड्यावर बसून फोटो काढत होते. यावेळी पाचगणीहून दोन दुचाकींवरून आलेल्या निखिल याने आपल्या मित्रांच्या मदतीने दीक्षाला पकडून ठेवले तर इतर दोघांनी आनंदवर कोयत्याने वार केले. आनंद रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तर दीक्षा किरकोळ जखमी झाली.चौकशीनंतर खुनाची कबुलीस्थानिक गुन्हे शाखा व वाई पोलिसांनी २४ तासांत खुनाचा उलगडा करून दीक्षा व तिचा प्रियकर निखिल मळेकर या दोघांनाही वाई ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. दीक्षा ओव्हाळ (कांबळे) व निखिल मळेकर यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दीक्षाच्या मनाविरुद्ध लग्न झाल्याने काही दिवसांपूर्वी निखिलच्या मदतीने पती आनंदच्या खुनाचा कट रचला.