शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

शिकार जंगलात.. मांसविक्री साताऱ्यात!

By admin | Updated: October 27, 2015 00:19 IST

वनविभाग सुस्त : अंबेदरे परिसरात परप्रातीयांकडून वन्यप्राण्यांच्या अवयवांचा उघडउघड बाजार --लोकमत विशेष

संतोष कणसे --शाहूपुरी--वन्यप्राण्यांच्या शिकारीसंदर्भात कायदे कितीही कडक असले तरी आजही बिनदिक्कत सातारच्या जंगलात रानडुकरांची शिकार होत आहे. एवढेच नव्हे तर भरदिवसा त्याची रस्त्याकडेलाच विक्री केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.सातारा शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबेदरे रस्त्याकडेला काही परप्रांतीय शिकार केलेल्या रानडुकराची विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, रविवारीही याच भागात मारलेल्या रानडुकराची विक्री केल्याचे समोर आले आहे. वन कायद्याची भीती दाखविणाऱ्या वनविभागाच्या नाकावर टिच्चून काही परप्रांतीय कायदा बासनात बांधून वन्यप्राण्यांची शिकार करत आहेत. मात्र तरीही या प्रकाराची कुणकुणही वनविभागाला लागलेली नाही. वनक्षेत्रात होत असलेल्या शिकारीबाबत वनविभागाला काहीच माहिती कशी असू शकत नाही, याबाबत नागरिकांमधून शंका उपस्थित होत आहे.अंबेदरे परिसरात फिरून लोकांशी बोलून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, काही महिन्यांपासून परराज्यातील टोळी येथील परिसरात वास्तव्यास आहे. आपल्या उपजीविकेसाठी ही टोळी जंगलात फिरून रानडुकरांची शिकार करते आणि गावोगावी जाऊन त्याची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. शिकारीतून महिन्यात लाखोंची कमाई---अंबेदरे रस्त्यावर सोमवारी सकाळी शिकार केलेल्या रानडुकराची विक्री सुरु होती. त्यावेळी टोळीतील पुरुष-महिला तिथे होत्या. त्यांना याबाबत विचारले असता एकाने सांगितले की, अनेक महिन्यांपासून आम्ही शिकार करत आहे. शिकार करून त्याची गावोगावी जाऊन विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले. पंधरा ते सतरा किलो वजनाच्या एका रानडुकराच्या विक्रीतून तीन ते साडेतीन हजार रुपये मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. वन्यप्राण्यांच्या शिकारीतून लाखो रुपयांची कमाई करत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.दिवसाआड शिकार!दिवसाआड एका तरी रानडुकराची शिकार आम्ही करतो, अशी माहिती टोळीतील एकाने दिली. जंगलात जाळी लावून सावज पकडायचे आणि कुऱ्हाडीने त्याला मारायचे, अशी त्यांच्या शिकारीची पद्धत आहे. पहाटे शिकार करून सकाळी त्याची विक्री केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शिकाऱ्यांना ना कायद्याची भीती ना शिक्षेची...भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये कोणत्याही वन्यजीवाची शिकार करणे, हा गंभीर गुन्हा मानला जातो. गुन्हा सिद्ध झाल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, या वास्तवापासून ही शिकारी मंडळी जवळजवळ अनभिज्ञच आहे. वन्यप्राण्याचा जीव घेताना त्यांना ना कायद्याची भीती आहे ना शिक्षेची. म्हणूनच कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी इत्यंभूत माहिती दिली. वनविभागाच्या कारवाईकडे लक्षसातारा शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धनवडेवाडी परिसरातील जंगलात रानडुकरांची शिकार होते अन् वनविभागाला त्याची कुणकुणही लागत नाही, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन वनविभाग काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.