शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

शिकार जंगलात.. मांसविक्री साताऱ्यात!

By admin | Updated: October 27, 2015 00:19 IST

वनविभाग सुस्त : अंबेदरे परिसरात परप्रातीयांकडून वन्यप्राण्यांच्या अवयवांचा उघडउघड बाजार --लोकमत विशेष

संतोष कणसे --शाहूपुरी--वन्यप्राण्यांच्या शिकारीसंदर्भात कायदे कितीही कडक असले तरी आजही बिनदिक्कत सातारच्या जंगलात रानडुकरांची शिकार होत आहे. एवढेच नव्हे तर भरदिवसा त्याची रस्त्याकडेलाच विक्री केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.सातारा शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबेदरे रस्त्याकडेला काही परप्रांतीय शिकार केलेल्या रानडुकराची विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, रविवारीही याच भागात मारलेल्या रानडुकराची विक्री केल्याचे समोर आले आहे. वन कायद्याची भीती दाखविणाऱ्या वनविभागाच्या नाकावर टिच्चून काही परप्रांतीय कायदा बासनात बांधून वन्यप्राण्यांची शिकार करत आहेत. मात्र तरीही या प्रकाराची कुणकुणही वनविभागाला लागलेली नाही. वनक्षेत्रात होत असलेल्या शिकारीबाबत वनविभागाला काहीच माहिती कशी असू शकत नाही, याबाबत नागरिकांमधून शंका उपस्थित होत आहे.अंबेदरे परिसरात फिरून लोकांशी बोलून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, काही महिन्यांपासून परराज्यातील टोळी येथील परिसरात वास्तव्यास आहे. आपल्या उपजीविकेसाठी ही टोळी जंगलात फिरून रानडुकरांची शिकार करते आणि गावोगावी जाऊन त्याची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. शिकारीतून महिन्यात लाखोंची कमाई---अंबेदरे रस्त्यावर सोमवारी सकाळी शिकार केलेल्या रानडुकराची विक्री सुरु होती. त्यावेळी टोळीतील पुरुष-महिला तिथे होत्या. त्यांना याबाबत विचारले असता एकाने सांगितले की, अनेक महिन्यांपासून आम्ही शिकार करत आहे. शिकार करून त्याची गावोगावी जाऊन विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले. पंधरा ते सतरा किलो वजनाच्या एका रानडुकराच्या विक्रीतून तीन ते साडेतीन हजार रुपये मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. वन्यप्राण्यांच्या शिकारीतून लाखो रुपयांची कमाई करत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.दिवसाआड शिकार!दिवसाआड एका तरी रानडुकराची शिकार आम्ही करतो, अशी माहिती टोळीतील एकाने दिली. जंगलात जाळी लावून सावज पकडायचे आणि कुऱ्हाडीने त्याला मारायचे, अशी त्यांच्या शिकारीची पद्धत आहे. पहाटे शिकार करून सकाळी त्याची विक्री केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शिकाऱ्यांना ना कायद्याची भीती ना शिक्षेची...भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये कोणत्याही वन्यजीवाची शिकार करणे, हा गंभीर गुन्हा मानला जातो. गुन्हा सिद्ध झाल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, या वास्तवापासून ही शिकारी मंडळी जवळजवळ अनभिज्ञच आहे. वन्यप्राण्याचा जीव घेताना त्यांना ना कायद्याची भीती आहे ना शिक्षेची. म्हणूनच कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी इत्यंभूत माहिती दिली. वनविभागाच्या कारवाईकडे लक्षसातारा शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धनवडेवाडी परिसरातील जंगलात रानडुकरांची शिकार होते अन् वनविभागाला त्याची कुणकुणही लागत नाही, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन वनविभाग काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.