शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

दराअभावी शेकडो ट्रक कांदा ऐरणीत पडून

By admin | Updated: August 29, 2016 00:03 IST

आठ रुपये दर : बदलत्या वातावरणामुळे कोंब येणे, पाणी शिरल्याने नासण्याचे प्रमाण वाढले

पुसेगाव : गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा पिकाच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे खटाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अवघे आठ ते दहा रुपये दर निघाल्याने शेकडो ट्रक कांदा अद्यापही ऐरणीतच पडून आहे. बदलत्या वातावरणामुळे त्या कांद्याला कोंब येणे, पाणी शिरल्याने कांदा नासणे तसेच काजळी चढून रंग बदलत असल्याने ऐरणीतच सुमारे साठ टक्के कांदा बाद होत आहे. या परिसरात नाशिक गरवा कांद्याचे पाच महिन्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कमी भांडवलात जादा नफा मिळवून देणारे पीक असल्याने गेल्यावर्षी रब्बी हंगामात सर्रास शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. गोर्टी कांद्यापासून बी तयार करून शेतकरी आपल्याच शेतात स्वत:साठी तसेच विक्रीसाठी कांद्याचे रोपे तयार करतात. साधारणत: दीड महिन्याचे रोप लागवडी योग्य झाल्यानंतर आॅक्टोबरमध्ये सोयीनुसार कांदा पिकाची लागवड केली जाते. गेल्यावर्षी खरिपासह रब्बी हंगामात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली होती. तरीही उपलब्ध पाण्याच्या जोरावर या भागातील पुसेगाव, बुध, करंजओढा, फडतरवाडी, नेर, राजापूर, काटेवाडी, वेटणे, रणसिंगवाडी तसेच डिस्कळ, ललगुण, अनपटवाडी, शिंदेवाडी, नागनाथवाडी, जांब, जाखणगाव, विसापूर, पवारवाडी, वर्धनगड ही गावे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्यावर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी नव्याने कांदा लागवड करण्यासाठी एकरी १५ ते २० हजारांची रोपे विकत घेऊन एकरी ५ हजार रुपये दराने कांदा लागवड करणाऱ्या महिला मजुरांकडून लागवड केली. रासायनिक खते, आंतर मशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला होता. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत थंडीचे प्रमाण तुलनेने कमीच राहिल्याने धुक्यामुळे कांद्यावर करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे औषधांच्या तीन-चार फवारण्या करून शेतकरी वैतागला होता. त्यातच सर्वत्र विहिरींची पाण्याची पातळी कमालीची खोल गेलीय. (वार्ताहर)