शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

शेकडो टन कचरा झाला हद्दपार!

By admin | Updated: February 10, 2015 00:27 IST

जिल्हाभर स्वच्छता : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

सातारा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग) च्या वतीने सातारा जिल्ह्यातील पाच मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या गावामध्ये दि. १ फेब्रुवारी रोजी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून हे अभियान राबविण्यात आले. शेकडो सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गावातील कानाकोपऱ्यातील शेकडो टन कचरा गोळा केला. श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून सशक्त समाजमन घडविण्याबरोबरच संत विचारांतून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करून सामाजिक एकता अखंडित राखण्याचे कार्य गत सात दशकांपासून धर्माधिकारी परिवार करत आहे. याच कार्याची दखल घेत केंद्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानासाठी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छता दूत म्हणून निवड केली आहे. गत पाच महिन्यांपूर्वीच धर्माधिकारी प्रतिष्ठानने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सर्वात मोठे स्वच्छता अभियान राबविले होते. यामध्ये लाखो ‘श्री सदस्य’ सहभागी झाले होते. रविवार, दि. १ रोजी जिल्ह्यातील अतीत (ता. सातारा), भुर्इंज (ता. वाई), सातारारोड (ता. कोरेगाव), वत्सलानगर (ता. कराड), मारुल हवेली (ता. पाटण) या गावांमध्ये सकाळी ७.३० वाजता शेकडो श्री सदस्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचा प्रारंभ झाला. वडूज शहरात ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता मोहीम झाली. यावेळी बाजारसमितीचे सभापती अशोकराव गोडसे, प्रा. बंडा गोडसे, तहसीलदार विवेक साळुंके, गटविकास अधिकारी राहुल देसाई यांची उपस्थिती होती.सदस्यांनी गावातील प्रमुख मार्गांसह ठिकठिकाणचा शेकडो टन कचरा गोळा केला. अभियानासाठी झाडू, फावडे, घमेली, खोरे आदी वस्तू सदस्यांनी स्वत: आणल्या होत्या. ग्रामपंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी वाहनांची सोय केली होती. तसेच रविवार, दि. ८ रोजी सायगाव (ता. जावळी), बावधन (ता. वाई), पुसेगाव (ता. खटाव), कोळे (ता. कराड), चरेगाव (ता. कराड) व तारळे (ता. पाटण) येथे हे अभियान राबविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)शिरवळमध्ये स्वच्छता मोहीमशिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने शिरवळमधील मेनरोड, एस. टी. स्टँड परिसर, शिवाजी चौक, न्यू कॉलनी, शिवाजी कॉलनी, बाजारपेठ, केदारेश्वर कॉलनी, शिर्के कॉलनी, पळशी रोड, तांबेनगर, जय भवानीनगर आदी विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शिरवळ ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागानेही सहकार्य केले.