शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो भीमप्रेमींच्या गर्दीने कऱ्हाडचे रस्ते फुलले !

By admin | Updated: April 14, 2016 23:01 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती : मिरवणूक, मशाली अन् रॅलीची लगबग; सर्वपक्षीय नेत्यांचे महामानवाला अभिवादन

कऱ्हाड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गुरुवारी कऱ्हाडसह परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. गेले पंधरा दिवस कऱ्हाडमध्ये जयंतीचे औचित्य साधून छोटे-मोठे कार्यक्रम सुरू आहेत. बुधवारी जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातून १२५ मशालींची मिरवणूक काढण्यात आली. तर गुरुवारी सकाळी युवकांच्या वतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तर उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो भीमप्रेमी सहभागी झाले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येकवर्षी साजरी होतेच; पण या वर्षीच्या जयंती सोहळ्याला १२५ वर्षे पूर्ण झाल्याने अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे कऱ्हाड शहरात सर्वसमावेशक जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली आणि गेले दहा दिवस व्याख्याने, शिबिरे, स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम त्यामार्फत सुरू होते. नगरपालिकेजवळ असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पाठीमागे भव्य आरास करण्यात आलेली आहे. तर संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने झगमगत आहे.दरम्यान, बुधवारी रात्री उत्सव समितीच्या वतीने १२५ मशाली घेऊन शहरातून मशाल मिरवणूक काढण्यात आली. यात सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, अल्ताफ शिकलगार, संयोजन समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ थोरवडे, उपाध्यक्ष किशोर आठवले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यावरून ही मशाल मिरवणूक काढून डॉ. बाबासाहेब यांच्या आठवणींना जणू उजाळा देण्याचाच प्रयत्न करण्यात आला. गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सिद्धार्थ थोरवडे, अभिजित थोरवडे, राहुल थोरवडे, किशोर आठवले, विजय काटरे, किरण थोरवडेसह शेकडो कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला. दत्तचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही त्यांनी अभिवादन केले. यावेळी ‘जयभीम’ आणि ‘जय शिवराय’ या घोषणानीही परिसर दुमदुमून गेला.सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. झांजपथक, बँडपथक, लेझीमपथक आदी वाद्यांच्या गजरात निघालेल्या हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब यांनी समाजाला शांतीचा संदेश दिला त्याला अनुसरून मिरवणुकीत सहभागी चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले पुतळा, बापूजी साळुंखे पुतळा, एसटी स्टँड, दत्तचौक, मुख्य बाजारपेठ, चावडीचौक, कन्याशाळा, जोतिबा मंदिरापासून आंबेडकर चौकात येऊन पूर्ण केली. (प्रतिनिधी)