शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते
2
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
3
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
4
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
5
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
6
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
7
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
8
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
9
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
10
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
11
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
12
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
13
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
14
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
15
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
16
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
17
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
18
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
19
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
20
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO

शाडूच्या शेकडो मूर्तींचे टोपलीत विसर्जन

By admin | Updated: September 13, 2016 00:45 IST

इकोफ्रेंडली गणेशोत्सव : पाचवडच्या महात्मा गांधी विद्यालयाचा उपक्रम; विद्यार्थ्यांनी साकरलेल्या मूर्तींची घरोघरी स्थापना

पाचवड : पाचवड, ता. वाई येथील रयतच्या महात्मा गांधी विद्यालयात पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना स्वत:च्या हाताने तयार केलेल्या शाडूच्या दोनशे मूर्तींचे विद्यालयात पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या नव्या संकल्पनेचे ग्रामस्थांनीही भरभरून कौतुक केले. शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण शाळेतील कला शिक्षक प्रदीप कुंभार यांनी एका कार्यशाळेचे आयोजन करून दिले होते. त्यावेळी सुमारे दोनशे शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. पर्यावरणाचे संरक्षण हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून यावेळी महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथील सर्व शिक्षकांनी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला होता. शाडूच्या मूर्ती बनविण्यात पारंगत असलेले शाळेचे कला शिक्षक प्रदीप कुंभार यांनी पुढाकार घेऊन सातारा येथील नामांकित व्यापारी वागडोळे यांच्याकडून शाडूची माती उपलब्ध केली. कार्यशाळेत पाचवी तेआठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून या मातीपासून सुमारे दोनशे शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्यात आल्या. या गणेशमूर्तींचे वाटप उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना करून या विद्यार्थ्यांच्या घरी याच मूर्तींची प्रतिष्ठापना करून घेतली. या मूर्तींचे शाळेत पाण्याने भरलेल्या टपात विसर्जन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बी. जी. कणसे, बी. जे. गायकवाड, दत्ताशेठ बांदल, सरपंच महेश गायकवाड, अशोकराव गायकवाड, रमेश पारखे उपस्थित होते. (वार्ताहर)विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावकार्यशाळेमुळे सर्व विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कला तर मिळाली. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांच्या घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापनाही झाली. या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जनही पर्यावरणपूरकरीत्या करण्यात आले. शाळेतील शिक्षकवृंदाच्या या कौतुकास्पद कार्याबद्दल परिसरातील सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच धार्मिक सण पर्यावरणपूरक पद्धतीने कसे साजरे करता येतील याचे ज्वलंत उदाहरणही यामुळे मिळाले. पाण्याचा झाडांसाठी पुर्नवापर विसर्जित करण्यात आलेल्या मूर्तींची सुरुवातीला विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये या गणेशमूर्तींना ठेवून त्यांच्यावर पाणी ओतून मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. विसर्जनानंतर साठलेले संपूर्ण पाणी बागेतील झाडांसाठी वापरण्यात आले. तसेच विद्यालयातील इतर वर्गांमधील सर्व विद्यार्थ्यांनीही आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीनेच करण्याचा संकल्प यावेळी केला.