शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

पंढरीच्या वाटेवर शेकडो बियांची लागण

By admin | Updated: July 26, 2015 00:03 IST

मायणी-पंढरपूर रस्ता : बत्तीस शिराळा येथील वारकऱ्यांचा कृतीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश

मायणी : आषाढीवारीसाठी निघालेल्या बत्तीस शिराळा येथील वारकऱ्यांनी मायणी-पंढरपूर या ९४ किलोमीटर अंतराच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा शेकडो बियांची लागण करून कृतीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. भविष्यात दुष्काळी भागातील हा रस्ता हिरवाईनं फुलून जावा, अशी प्रार्थना त्यांनी विठुरायाकडे केली. विविध भागांतून शेकडो वारकरी पायी दिंड्या घेऊन पंढरपूरकडे रवाना होतात. यंदाही मायणी-पंढरपूर या मार्गावरून पायी दिंड्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं मार्गस्थ होत होत्या. त्यामध्ये बस्तीस शिराळा, ता. सांगली येथील पायी दिंडीतील वारकऱ्यांनी भक्तिमार्गाचे आचरण करतानाच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला. या दिंडीतील वारकऱ्यांनी सुमारे ९४ किलोमीटर अंतराच्या या रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारच्या बियांचे टोकण केले. उंबर फाउंडेशन पुणे व पांडुरंग माने गुरुजी यांच्या संयुक्त विद्यमाने बत्तीस शिराळा येथील पायी दिंडीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा बिया टोकल्या. या उपक्रमामुळे भक्तीला खऱ्या अर्थाने पर्यावरणाची जोड मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या परिसरात चांगला पाऊस होऊन आम्ही लावलेल्या बियांचे वृक्षात रूपांतर व्हावे, अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करणार असल्याचे वारकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)