शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

शंभर किलो फुलांच्या पायघड्या !

By admin | Updated: October 15, 2015 00:23 IST

नव्या नगराध्यक्षांसाठी अनोखे स्वागत : साताऱ्याच्या यंग ब्रिगेडने केली होती जय्यत तयारी

सातारा : पालिकेच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच नूतन नगराध्यक्ष विजय बडेकर यांचे त्यांच्या समर्थकांनी शाही पद्धतीने स्वागत केले. नगराध्यक्षांचे दालन आणि ज्या सभागृहात निवड झाली. त्या सभागृहापासून ते पालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत सगळीकडेच फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. हा आगळावेगळा सोहळा पालिकेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच अनुभवता आला. सुमारे १०० किलो फुलांच्या या पायघड्या होत्या. सातारा पालिकेमध्ये मनोमिलनाची सत्ता असल्याने दोन्ही आघाड्यांतून आपापल्या नगरसेवकांना पदे दिली जातात. काम करण्यास किती कालावधी मिळाला, यापेक्षा पद मिळालं, हे एखाद्या सर्वसामान्य नगरसेवकासाठी महत्त्वचं असतं. सातारा पालिकेमध्ये आजपर्यंत ४५ नगराध्यक्षहून गेले. पूर्वी पाच वर्षांचा काळ नगराध्यक्ष पूर्ण करत होते; परंतु मनोमिलनाची सत्ता २००६ रोजी आल्यानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाचा सव्वा वर्षासाठी कार्यकाळ वाटून घेण्यात आला. मनोमिलनाच्या कालावधीत आत्तापर्यंत १२ जणांनी नगराध्यक्षपद भूषविले. सातारासारख्या ऐतिहासिक शहराचे नगराध्यक्षपद होणे हे अभिमानाची बाब आहे. त्यामुळे या पदासाठी नेहमीच रस्सीखेच होत असते. नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने जल्लोष करतात; परंतु नूतन नगराध्यक्ष बडेकर यांचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ती पद्धत आत्तापर्यंत अवलंबली नव्हती. (प्रतिनिधी)पालिका झाली गुलालमय...नगराध्यक्षपदी विजय बडेकर तर उपनगराध्यक्षपदी जयवंत भोसले यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीमध्ये विशेषत: तरुण मुले दिसत होती. बडेकर यांच्या स्वागतासाठी या मुलांनी शंभर किलो फुले आणली. संपूर्ण पालिकेमध्ये या फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तितकाच गुलालही होता. गुलालाची उधळण केल्यामुळे पालिका गुलालमय झाली होती. नूतन नगराध्यक्षांचे हे आगळेवेगळे स्वागत पाहण्यासाठी सातारकरांनीही गर्दी केली होती. उपगनराध्यक्ष जयवंत भोसले यांच्या समर्थकांमध्येही यंग ब्रिगेडचा जत्था मोठा होता. उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जयवंत भोसले यांना त्यांच्या दालनापासून ते गाडी ज्या ठिकाणी उभी होती तिथंपर्यंत खांद्यावर उचलून कार्यकर्त्यांनी नेले. इतका उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता. खुर्चीवरून उठायचं नाही : उदयनराजे विजय बडेकर यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी ‘आता खुर्चीवर बसलात उठायचं नाही,’ असा सल्ला देत १९९१ च्या पालिका निवडणुकीची आठवण काढली. ते म्हणाले, ‘मी पालिकेत निवडून आलो, त्यावेळी विरोधात सहा नगरसेवक होते. तुम्ही आता नशीबवान आहात.’