शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो एकरातील पिकांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:42 IST

सणबूर : ढेबेवाडी विभागातील वाल्मिक पठार व इतर गावांतील शिवारात रानडुकरे व वानरांनी धुमाकूळ घातला आहे. कित्येक एकर शेतातील ...

सणबूर : ढेबेवाडी विभागातील वाल्मिक पठार व इतर गावांतील शिवारात रानडुकरे व वानरांनी धुमाकूळ घातला आहे. कित्येक एकर शेतातील पिकांचे त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ढेबेवाडी विभागात बागायती क्षेत्र कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची मदार खरीप हंगामावरच असते. खरीप हंगामात प्रामुख्याने ज्वारी, भात, भुईमूग, मका, सोयाबीन व इतर कडधान्याची पिके घेतली जातात. यावर्षी पावसाच्या उघडीपीमुळे पिके चांगली आली. मात्र, रानडुक्करांच्या व वानरांच्या त्रासामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रात्रीच्यावेळी रानडुक्करांच्या झुंडीच्या झुंडी तर दिवसा वानरांचे कळप शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत.

दिवसेंदिवस वाढत असलेले खतांचे दर, मजुरांची कमतरता तसेच लावणीसाठी व बियाण्यांसाठी बँका, सोसायट्यांचे काढलेले कर्ज यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, वाढत्या खर्चाने आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांवर अधिक कर्जाचा बोजा पडत आहे. कित्येक एकर शिवारातील पिकाची सध्या रानडुकरे व वानरांनी नासधूस केली आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या राखणीसाठी दिवस-रात्र पाळत ठेवावी लागत आहे तर काहींना राखण करणे शक्य नसल्याने शेतातील उभे पीक नष्ट होताना पाहावे लागत आहे.

- कोट

रानडुक्कर व वानरांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेती करणे परवडत नाही. शेतीसाठी काढलेल्या कर्जाचे व्याज भरण्याएवढेही उत्पन्न मिळत नाही. याशिवाय वन विभागाकडे याबाबत नुकसानभरपाईसाठी अर्ज केला तर त्यांच्याकडून तुटपुंजी मदत दिली जाते. त्यामुळे वाल्मिक पठारावरील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी तशाच पडून आहेत.

- मारुती मस्कर

शेतकरी, कसणी