शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेकडो एकरातील पिकांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:42 IST

सणबूर : ढेबेवाडी विभागातील वाल्मिक पठार व इतर गावांतील शिवारात रानडुकरे व वानरांनी धुमाकूळ घातला आहे. कित्येक एकर शेतातील ...

सणबूर : ढेबेवाडी विभागातील वाल्मिक पठार व इतर गावांतील शिवारात रानडुकरे व वानरांनी धुमाकूळ घातला आहे. कित्येक एकर शेतातील पिकांचे त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ढेबेवाडी विभागात बागायती क्षेत्र कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची मदार खरीप हंगामावरच असते. खरीप हंगामात प्रामुख्याने ज्वारी, भात, भुईमूग, मका, सोयाबीन व इतर कडधान्याची पिके घेतली जातात. यावर्षी पावसाच्या उघडीपीमुळे पिके चांगली आली. मात्र, रानडुक्करांच्या व वानरांच्या त्रासामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रात्रीच्यावेळी रानडुक्करांच्या झुंडीच्या झुंडी तर दिवसा वानरांचे कळप शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत.

दिवसेंदिवस वाढत असलेले खतांचे दर, मजुरांची कमतरता तसेच लावणीसाठी व बियाण्यांसाठी बँका, सोसायट्यांचे काढलेले कर्ज यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, वाढत्या खर्चाने आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांवर अधिक कर्जाचा बोजा पडत आहे. कित्येक एकर शिवारातील पिकाची सध्या रानडुकरे व वानरांनी नासधूस केली आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या राखणीसाठी दिवस-रात्र पाळत ठेवावी लागत आहे तर काहींना राखण करणे शक्य नसल्याने शेतातील उभे पीक नष्ट होताना पाहावे लागत आहे.

- कोट

रानडुक्कर व वानरांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेती करणे परवडत नाही. शेतीसाठी काढलेल्या कर्जाचे व्याज भरण्याएवढेही उत्पन्न मिळत नाही. याशिवाय वन विभागाकडे याबाबत नुकसानभरपाईसाठी अर्ज केला तर त्यांच्याकडून तुटपुंजी मदत दिली जाते. त्यामुळे वाल्मिक पठारावरील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी तशाच पडून आहेत.

- मारुती मस्कर

शेतकरी, कसणी