शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

माणसं सुधारली, वस्ती मागासलेलीच !

By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST

आरफळ दलित वस्ती: दारिद्र्यरेषेतून वगळल्याने चिंतेत आणखी भर

सुनील साबळे -- शिवथर -सातारा तालुक्यातील बागायती समजलं जाणारं आरफळ गाव. या गावामध्ये दलित व मातंग वस्ती गावाच्या बाहेर १२५ वर्षांपूर्वीपासून आहे. आज या वस्तीमध्ये चार-पाच मुले इंजिनिअर, दोन मुले सैन्य दलात, पाच-सहा शासकीय सेवेत कार्यरत आहेत. मात्र, भौतिक सुविधांअभावी वस्ती मागासलेलीच राहिली.पूर्वी हे लोक गावामध्येच जमदार वाडा याठिकाणी राहात होते. आता मात्र वस्तीवरील काहींना जमीन नसल्याने आणि अशिक्षितपणामुळे नोकरी अथवा व्यवसाय नव्हता. आरफळ गावामध्ये दलित समाजातील ५० ते ६० कुटुंबे राहतात. त्यांची लोकसंख्या सरासरी ३०० ते ४०० आहे. १९७१ च्या युद्धात याच वस्तीतील दामू लक्ष्मण माने हे हुतात्मा झाले होते. हळूहळू लोक उदरनिर्वाहासाठी काम करू लागले. ग्रामपंचायत स्थापन झाली; परंतु सात-आठ वर्षे आम्हाला कोणताही लाभ मिळाला नसल्याचे वयस्कर लोकांकडून बोलण्यात आले. आजही या वस्तीतील रस्ते डांबराच्या प्रतीक्षेत आहेत.काही कालांतराने थोडी-थोडी सुधारणा होऊ लागली. येथील दारिद्र्यरेषेखालचा सर्व्हेही झाला; पण त्याचा लाभ ज्यांना मिळाला पाहिजे, त्यांना न मिळता तो लाभ म्हणे दुसऱ्याच लोकांना मिळत आहे. हा सर्व्हेच चुकीचा झाला, असे लोकांमधून बोलले जातेय. ग्रामसभेतही या समस्यांवषयी मोकळ्याच चर्चा रंगत होत असल्याचे दिसून येत आहे.आरफळमध्ये अंगणवाडी या वस्तीसाठी आहे. पण जागा नसल्यानं मराठी शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. या दलितवस्तीकडे जाण्यासाठी पूर्वी ओढ्यातून जावे लागत होते. पावसाळ्यात तर गावचा संपर्क तुटला जायचा. सध्या पुलाची सोय आहे; पण देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. पण, या दलित वस्तीमध्ये रस्त्यावर कधी डांबर पडलं नाही. वस्तीतील ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी पावसाळ्यात मुरुम टाकला जातोय, असेही बोलले जातेय. गेली कित्येक वर्षे याबाबत पाठपुरावा केला सात- आठ प्रस्ताव शासनाकडे पाठविले; परंतु वस्तीकडे बघायला कुणाला वेळच नसल्याचे दिसून येते. माझे चुलत सासरे युद्धात हुतात्मा झाले. माझे शिक्षण बीए झाले असून, मी अंगणवाडी मदतनीससाठी प्रस्ताव पाठविला होता; पण शासकीय अधिकाऱ्यांनी माझा विचार केला नाही. माझ्या जागेवर दुसऱ्या जातीच्या महिलेला घेतले. आम्ही गरीब आहे म्हणून का? आमच्यावर का अन्याय करताय.- विजया माने,महिला ग्रामस्थआता आमचा समाज सुधारलाय. आमची पोरंपण शिकल्यात; पण नोकऱ्या नाहीत. आम्ही उद्योग करावा तर भांडवल नाही. त्यासाठी शासनानं आमच्या मुलांना रोजीरोटीसाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे.- दगडू माने, माजी जवान