शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

माणसं सुधारली, वस्ती मागासलेलीच !

By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST

आरफळ दलित वस्ती: दारिद्र्यरेषेतून वगळल्याने चिंतेत आणखी भर

सुनील साबळे -- शिवथर -सातारा तालुक्यातील बागायती समजलं जाणारं आरफळ गाव. या गावामध्ये दलित व मातंग वस्ती गावाच्या बाहेर १२५ वर्षांपूर्वीपासून आहे. आज या वस्तीमध्ये चार-पाच मुले इंजिनिअर, दोन मुले सैन्य दलात, पाच-सहा शासकीय सेवेत कार्यरत आहेत. मात्र, भौतिक सुविधांअभावी वस्ती मागासलेलीच राहिली.पूर्वी हे लोक गावामध्येच जमदार वाडा याठिकाणी राहात होते. आता मात्र वस्तीवरील काहींना जमीन नसल्याने आणि अशिक्षितपणामुळे नोकरी अथवा व्यवसाय नव्हता. आरफळ गावामध्ये दलित समाजातील ५० ते ६० कुटुंबे राहतात. त्यांची लोकसंख्या सरासरी ३०० ते ४०० आहे. १९७१ च्या युद्धात याच वस्तीतील दामू लक्ष्मण माने हे हुतात्मा झाले होते. हळूहळू लोक उदरनिर्वाहासाठी काम करू लागले. ग्रामपंचायत स्थापन झाली; परंतु सात-आठ वर्षे आम्हाला कोणताही लाभ मिळाला नसल्याचे वयस्कर लोकांकडून बोलण्यात आले. आजही या वस्तीतील रस्ते डांबराच्या प्रतीक्षेत आहेत.काही कालांतराने थोडी-थोडी सुधारणा होऊ लागली. येथील दारिद्र्यरेषेखालचा सर्व्हेही झाला; पण त्याचा लाभ ज्यांना मिळाला पाहिजे, त्यांना न मिळता तो लाभ म्हणे दुसऱ्याच लोकांना मिळत आहे. हा सर्व्हेच चुकीचा झाला, असे लोकांमधून बोलले जातेय. ग्रामसभेतही या समस्यांवषयी मोकळ्याच चर्चा रंगत होत असल्याचे दिसून येत आहे.आरफळमध्ये अंगणवाडी या वस्तीसाठी आहे. पण जागा नसल्यानं मराठी शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. या दलितवस्तीकडे जाण्यासाठी पूर्वी ओढ्यातून जावे लागत होते. पावसाळ्यात तर गावचा संपर्क तुटला जायचा. सध्या पुलाची सोय आहे; पण देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. पण, या दलित वस्तीमध्ये रस्त्यावर कधी डांबर पडलं नाही. वस्तीतील ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी पावसाळ्यात मुरुम टाकला जातोय, असेही बोलले जातेय. गेली कित्येक वर्षे याबाबत पाठपुरावा केला सात- आठ प्रस्ताव शासनाकडे पाठविले; परंतु वस्तीकडे बघायला कुणाला वेळच नसल्याचे दिसून येते. माझे चुलत सासरे युद्धात हुतात्मा झाले. माझे शिक्षण बीए झाले असून, मी अंगणवाडी मदतनीससाठी प्रस्ताव पाठविला होता; पण शासकीय अधिकाऱ्यांनी माझा विचार केला नाही. माझ्या जागेवर दुसऱ्या जातीच्या महिलेला घेतले. आम्ही गरीब आहे म्हणून का? आमच्यावर का अन्याय करताय.- विजया माने,महिला ग्रामस्थआता आमचा समाज सुधारलाय. आमची पोरंपण शिकल्यात; पण नोकऱ्या नाहीत. आम्ही उद्योग करावा तर भांडवल नाही. त्यासाठी शासनानं आमच्या मुलांना रोजीरोटीसाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे.- दगडू माने, माजी जवान