शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

निराधार रोपट्यांना माणुसकीचा ओलावा

By admin | Updated: April 6, 2016 00:05 IST

बाटलीतून झाडांना पाणी : सर्वत्र लागणाऱ्या वणव्यामुळे वनविभागावर पर्यावरणप्रेमी संतप्त - गुड न्यूज

पांडुरंग भिलारे -- वाईसंपूर्ण राज्यात दुष्काळाची दाहकता व भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ दुष्काळी पट्ट्यात न येणाऱ्या परिसरातही पाण्याचे स्त्रोत आटले असून, पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे़ उन्हाची तीव्रता वाढल्याने मर्यादित राहिलेले जलस्त्रोत ही संपण्याच्या मार्गावर आहेत़ या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून विविध ठिकाणी पर्यावरणप्रेमी पक्ष्यांना तसेच झांडाना आपापल्या परीने पाणी देण्याचे काम नोकरदार, व्यावसायिक , पर्यावरणप्रेमी करताना दिसत आहेत़ वाई-पसरणी घाटात, सोनजाईच्या डोंगरात, मांढरदेवीच्या घाटात या परिसरात अनेक लागवड केलेल्या रोपट्यांना पाणी घालण्याचे काम करीत आहेत़ तसेच विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी वॉटर बँक केल्याच्या दिसत आहेत़ यामुळे ऐन उन्हाच्या तीव्रतेतही झाडांना तसेच पक्ष्यांना दिलासा मिळाला आहे़ पसरणी घाटात वाईहून पाचगणीला नोकरीच्या निमित्ताने जाणारे कर्मचारीही येताना पाण्याचे कॅन भरून आणून अर्ध्या घाटात बसमधून उतरून झांडाना पाणी घालत आहेत. तसेच एसटी बसचे कर्मचारीही सहकार्य करताना दिसत आहेत़ अनेक झांडाना प्लास्टिकचे कॅन अडकवून त्याला सलाईनद्वारे पाणी दिल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत़माणसांना तसेच पशुपक्ष्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. जमिनीत कोणत्याही प्रकारचा ओलावा राहिलेला नाही़ यामुळे शिवारात तसेच डोंगरात, माळावर वर असणाऱ्या लहान-लहान रोपट्यांनाही जिवंत राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे़ त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय, शेतकरी तसेच विघ्नसंतोषी लोकांमुळे खासगी शेतीच्या व पडीक रानात तसेच वनविभागाच्या डोंगरात वणवा लावणाऱ्यांची मुजोरी वाढत चालली आहे. दोषींना कोठेही दंड अथवा कडक शासन होताना दिसत नसल्याने पर्यावरणप्रेमी हतबल असून, त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे़